20 April 2024 7:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

वणी पालिका भाजपकडे, लोकांची तहान भागवते राज ठाकरेंची मनसे

यवतमाळ : वणी शहराची एक हाती सत्ता भाजपकडे असताना सुद्धा इथे स्थानिकांच्या पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे. सत्ताधारी केवळ टँकर माफियांना पोसण्यातच मग्न असून त्यांचे शहरवासीयांच्या मूळ समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. मे महिन्यामुळे उन्हाची झळ सर्वच घरात पोहोचली असून प्राण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. परंतु इथल्या स्थानिकांची रोजची तहान भागविण्याची जवाबदारी मनसेचे राजू उंबरकर आणि पदाधिकारी नित्याने पेलत आहेत.

शहरात आठ वर्षांपूर्वी भीषण पाणी टंचाई झाली होती. त्या पाणी टंचाईचे मूळ कारण पालिकेचे पाण्यासंबंधित असलेले धोरण हेच जवाबदार होते. शहरात भाजपची एक हाती सत्ता आल्याने अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी नागरिकांची अटकळ होती जी फोल ठरली आहे. कारण पाण्याच्या टंचाईची झळ तीव्र झाल्यावर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. भाजपप्रणीत पालिकेचा हा प्रकार म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदायला घेणे असाच म्हणावा लागेल. त्यांनी केवळ वर्धा नदीचं आता तारणहार आहे असा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला. कारण भुरकी घाटावरून वर्धा नदीच्या पात्रातून शहरात यावर्षी पाणीपुरवठा होणे शक्य नाही. पालिका प्रशासन शहरवासीयांच्या डोळ्यात केवळ धूळपेक करत असल्याचा आरोप शहरवासी करत आहेत.

महत्वाचं म्हणजे पालिकेने सुरु केलेले टँकर नक्की कुठे पाणी पुरवठा करतात तेच कळू शकलेलं नाही. त्यामुळे भाजपप्रणीत पालिका प्रश्नाचे वेगळेच हितसंबंध असावेत अशी कुजबुज शहरात सुरु आहे. शहरात ऐन मे महिन्यात प्रचंड पाणी टंचाई झाली असताना राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरवासीयांसाठी धावून आली असून त्यांनी वणी शहरात मागेल त्याला पाणी हा उपक्रम सुरु केल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणी प्रश्नामुळे आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजपला वणी शहरातील नागरिकांनी फटका दिल्यास नवल वाटायला नको. कारण स्थानिकांच्या पाणी प्रश्नावर मनसेचे नेते राजू उंबरकर आणि पदाधिकारी अनेक वर्ष लढा देत असून वेळप्रश्नी स्वतः आर्थिक हातभार लावून लोकांच्या समस्या दूर करण्यावर भर देत आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x