24 April 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला
x

सुप्रिया सुळेंचे तावडेंना आव्हान, मी काय खोटे बोलले ते सांगा?

पुणे : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मागे आरोप केला होता की, राज्यातील शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात आहेत. त्यालाच अनुसरून खासदार सुप्रिया सुळेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंना आव्हान दिल की,’शिक्षणमंत्र्यांनी आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे’.

राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या शाळा बंदच्या धोरणाचा विरोध दर्शविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. शाळांचे समायोजन करताना सरकारकडून शिक्षण हक्क कायद्याचा भंग होत असून शाळा बंद करताना सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही पर्यायांचा विचार केलेला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शिरूर तालुक्‍यातील भिल्लवस्तीमधील शाळा बंद करून सरकारने तेथील मुलांचे शिंदोडीतील शाळेत समायोजन केले आहे. परंतु, मुलांना शाळेत जाण्यासाठी एक-दीड किलोमीटर नव्हे, तर तब्बल ३ किलोमीटर पायपीट करत पोहोचावं लागणार आहे. बारामतीमधील गारमळा येथील विद्यार्थ्यांच सुद्धा तेच होणार आहे.

महाराष्ट्रातील असंख्य शाळा ग्रामस्थ, ग्रामपंचायती व जिल्हा परिषद यांचा विरोध असतानाही शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. परंतु त्यातून विद्यार्थ्यांची केवळ फरफट होणार असून, सरकारकडून ती फरफट दुर्लक्षित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना होणाऱ्या या त्रासाचा विचार सरकारने “पालक’ म्हणून केलाय का?, असा प्रश्‍न खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

शाळा : समायोजन झालेली शाळा : अंतर (कि.मी)
बागलफाटा : बावडा : २.५
शास्ताबाद तालुका शिरूर: उकीरडेवस्ती : १.७
पवारवस्ती तालुका इंदापूर: वायसेवाडी : ०२
भिल्लवस्ती तालुका शिंदोडी : २.९
वेलहावळे तालुका खेड: काळोखेवस्ती : १.८

हॅशटॅग्स

#NCP(372)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x