20 April 2024 6:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

शेतकरी आंदोलन | 30 तारखेपर्यंत तोडगा निघतो का त्याची वाट पाहू | अन्यथा

NCP President Sharad Pawar, Modi government, Farmers protest

मुंबई, २८ डिसेंबर: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला तरी त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शरद पवारांनी शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला 30 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. 30 डिसेंबरपर्यंत तोडगा न काढल्यास विरोधी पक्षाला त्याचा विचार करावा लागेल, असा इशाराच पवारांनी दिला आहे. (NCP President Sharad Pawar warned Modi government over farmers protest)

मागील महिन्याभरापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीत आले आहेत. आज त्यांनी काही विरोधी पक्षनेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या आहेत. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारला सज्जड इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यातून काही मार्ग निघणार नाही का? सर्वजण आत्महत्येच्याच मार्गाने जाणार आहेत का? त्यामुळे राजकीय पक्षांनाही याबाबतचा विचार करावा लागेल. आता केंद्राने 30 तारखेला शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. ठिक आहे. 30 तारखेपर्यंत वाट पाहू. त्यातून तोडगा निघाला नाही तर आम्हाला बसावं लागेल. विरोधी पक्षांना त्याचा विचार करावा लागेल, असा इशारा पवारांनी दिला आहे.

पुढे शरद पवार म्हणाले, “मला वाटतं सरकारनं संपूर्ण आंदोलनं अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवं. यावर चर्चेद्वारे तोडगा काढला जाऊ शकतो. मी असंही ऐकलंय की आंदोलनादरम्यान चार ते पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. जर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवत असेल तर हे देशासाठी चांगलं नाही.” (Sharad Pawar said that I think the government should take the whole agitation very seriously)

दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या सरकारमधील कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर सध्याच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या भूमिकेवरुन टीका केली आहे. तोमर यांनी म्हटलं की, मनमोहन सिंग आणि शरद पवार यांची कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याची इच्छा होती.

 

News English Summary: Although the farmers’ agitation in Delhi has been going on for a month, it has not been resolved yet. Therefore, NCP President Sharad Pawar has come into action mode. Sharad Pawar has given a deadline of December 30 to the Center to resolve the farmers’ agitation. If a solution is not reached by December 30, the Opposition will have to consider it, Pawar has warned.

News English Title: NCP President Sharad Pawar warned Modi government over farmers protest news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x