28 March 2024 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

भाजपाचं शेतकऱ्यांना थकवा आणि पळवा | वेळ आली आहे मोदी सरकार पाडा आणि पळवा

TMC leader Mahua Moitra, Modi government, farmers protest

नवी दिल्ली, ४ जानेवारी: केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसातही सुरूच आहे. याच दरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे. त्यामुळे, आज तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एकीकडे तंबूंमध्ये भरलेले पाणी, भिजलेली ब्लँकेट्स अन् भिजलेली जळावू लाकडे ही स्थिती होती दिल्लीच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत गेल्या महिनाभराहून अधिक कालावधी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कॅम्पमधली. रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे या आंदोलक शेतकऱ्यांची दैना उडाली. पण, तरीही थंडी-पावसाचा सामना करीत हे शेतकरी निधड्या छातीने दिल्लीच्या सीमा अडवून उभे आहेत.

30 डिसेंबर रोजी झालेल्या सहाव्या फेरीच्या चर्चेदरम्यान आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चार पैकी दोन विषयांवर सहमती झाली. प्रस्तावित वीज कायदा, पेंढा जाळण्याशी संबंधित मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. मात्र, अद्याप दोन मुख्य मागण्यांवर शेतकरी कायम आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत कृषी कायदे मागे घेण्यावर तसेच किमान हमीभावाला कायद्याचे स्वरुप देण्यावर चर्चा होणार आहे. आजच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान, टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारला याच विषयाला अनुसरून लक्ष केलं आहे. या संदर्भात ट्विट करताना महुआ मोईत्रा यांनी म्हटलं आहे की, “भाजपाचं शेतकऱ्यांना थकवा आणि पळवा, आता वेळ आली आहे की मोदी सरकार पाडा आणि पळवा…

 

News English Summary: The agitation of farmers against the agriculture law implemented by the Center continues despite the severe cold and unseasonal rains. Meanwhile, another meeting was held between the central government and the farmers’ association today. This is the seventh meeting between the agitating farmers and the government. Therefore, it is expected that the problems of the farmers will be solved even today.

News English Title: TMC leader Mahua Moitra criticised Modi government over farmers protest issue news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x