20 April 2024 6:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

VIDEO | कृषी कायदे | २०१५ मधील राहुल गांधींची भविष्यवाणी ठरली खरी

Advocate Prashant Bhushal, Rahul Gandhi, farmers Protest

नवी दिल्ली, ९ जानेवारी: केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींदरम्यान झालेली आठवी बैठकही काल निष्फळ ठरली. या बैठकीनंतर तिन्ही कृषी कायदे रद्द होणार नाहीत. त्या व्यतिरिक्त इतर पर्याय असतील तर द्या, त्यावर विचार करू, असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्यापही सुटताना दिसत नाही.

दुसरीकडे संसदेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींनी दिलेले भाषण ज्येष्ठ विधितज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी रीट्वीट केले आहे. २०१५ मधील या भाषणात राहुल गांधी यांनी केलेली भविष्यवाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने खरी ठरवल्याचा हा दाखला मानला जात आहे.

राहुल गांधींचे ५ वर्षांपूर्वीचे भविष्यसूचक शब्द खरे होत आहेत. शेतीप्रधान जमीन ही उद्योगपतींकडे सुपूर्द करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना कमकुवत करीत आहेत, असे कॅप्शनमध्ये भूषण यांनी लिहिले आहे. व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलेय की, भारतातील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या किंमती वेगाने वाढत आहेत. उद्योजकांना ही जमीन हवी आहे. सरकार आपण काय करीत आहात? एकीकडे शेतकरी आणि मजूर कमकुवत. अशा वेळी जेव्हा शेतकरी अशक्त होईल, जेव्हा त्याला आपल्या पायांवर उभे राहता येणार नाही. मग तुम्ही त्याच्याविरुध्द अध्यादेशाद्वारे कुऱ्हाड मारणार आहात का?

 

News English Summary: Congress leader Rahul Gandhi’s speech in Parliament has been retweeted by senior jurist Prashant Bhushan. This is considered to be the proof that the prediction made by Rahul Gandhi in this speech in 2015 has been fulfilled by the government of Prime Minister Narendra Modi.

News English Title: Advocate Prashant Bhushal twit Rahul Gandhi speech in Loksabha 2015 regarding farmers news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x