17 April 2024 12:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

माओवादी, नक्षल शक्ती शेतकरी आंदोलन चालवत आहेत | RTI उत्तरातून पियुष गोयल तोंडघशी

farmers movement, Maoists and Naxalites, Piyush Goyal

मुंबई, १० जानेवारी: दिल्लामध्ये मागील दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी हे शेतकरी करत आहेत. मात्र केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेक फेऱ्यामधील चर्चा होऊनही या आंदोलनावर तोडगा निघू शकलेला नाही.

याच शेतकरी आंदोलवरून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी अत्यंत गंभीर आरोप केले होते. जर शेतकरी आंदोलनाने माओवादी आणि नक्षल शक्तींशी फारकत घेतली तर शेतकऱ्यांना सरकारचं म्हणणं लक्षात येईल, असं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं होतं आणि हे कायदे देशाच्या हिताचे असल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात येईल, असं त्यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं होतं. यानंतरही त्यांच्या मनात काही शंका असल्यास भारत सरकारचे दरवाजे शेतकऱ्यांसाठी खुले असून प्रत्येक मुद्दा आणि तरतुदीविषयी चर्चा व्हायला हवी, असं त्यांनी म्हटलं होतं.

केवळ एका गोष्टीबद्दल बोलून उठायचं, अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टीवरचा तोडगा निघू शकत नाही, हे आंदोलन आता शेतकऱ्यांच्या हातातून निघून त्यांच्या माओवादी आणि नक्षल शक्ती आंदोलन चालवत आहेत,” असा धक्कादायक आरोप पीयूष गोयल यांनी केला होता.

यासंदर्भात साकेत गोखले यांनी थेट केंद्रीय गृह मंत्रालयाकडून माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारून पियुष गोयल यांचा आरोप खरा आहे का याबाबत विचारणा केली होती. त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरात संबंधित आरोप खोटा असल्याचं म्हटलं असून पियुष गोयल खोटे आरोप करत असल्याचं सत्य समोर आलं आहे.

 

 

News English Summary: Union Railway Minister Piyush Goyal had made very serious allegations about the farmers’ agitation. Railway Minister Piyush Goyal had said that if the farmers’ movement parted ways with the Maoists and Naxalites, the farmers would realise what the government was saying and the farmers would realise that the laws were in the interest of the country, he told ANI. Even after this, if there is any doubt in his mind, the doors of the Indian government are open to the farmers and every issue and provision should be discussed, he had said.

News English Title: farmers movement parted ways with the Maoists and Naxalites said minister Piyush Goyal news updates.

हॅशटॅग्स

#PiyushGoyal(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x