24 April 2024 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
x

अर्णबला बालाकोट स्ट्राईकची आधीच माहिती असल्याचं संरक्षण खात्याला माहित होतं का ? | RTI ने प्रश्न

Saket Gokhale, Arnab Goswami, Balakot strike

मुंबई, १८ जानेवारी: टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात घडलेल्या घटनेत रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या व्हाट्सअँप संवादाचा 500 पानी दस्तऐवज सोशल मीडियावर लीक झाल्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संबंधित चॅटमध्ये गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय आणि सत्तारूढ सरकारच्या सदस्यांशी जवळीक, टीआरपी त्यांच्या बाजूने झुकवणे आणि भाजपा सरकारची मदत घेण्याचे प्रयत्न आणि बरेच काही समोर आलं आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे पुलवामा हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते तेव्हा देश हळहळला होता. मात्र अर्णब अत्यंत खुश झाला होता हे त्यांच्या चॅट वरून सिद्ध होतंय. 14 फेब्रुवारी 2019 च्या एका चॅटमध्ये गोस्वामी म्हणतात “हा हल्ला आम्ही वेड्याप्रमाणे जिंकला आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर CRPF जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तब्बल 40 जवान शहीद झाले होते, त्याच दिवशी हा संवाद झाल्याने अर्णब गोस्वामी किती भीषण माणूस आहे याचा प्रत्यय आला आहे. विशेष म्हणजे त्यानंतर बालाकोट स्ट्राईकच्या तीन दिवस आधीच अर्नबला त्याची माहिती असल्याचं चॅट मध्ये दिसतंय. देशाच्या सिक्रेट लष्करी कारवाईबद्दल त्याला माहिती कशी प्राप्त झाली आणि त्याचा थेट संबंध पीएमओ’शी जोडला जाऊ लागल्याने मोदींनी पायउतार व्हावं अशी मागणी समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

दरम्यान, लष्कराच्या सिक्रेट कारवाईबद्दल अर्णबला आधीच माहिती असल्याचं समोर आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे याचा थेट संबंध भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय आणिराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी जोडला जाऊ लागला आहे. त्यामुळे अर्णबला बालाकोट स्ट्राईकची माहिती असल्याचं देशाच्या संरक्षण मंत्रालयाला माहिती होतं का असा थेट RTI’ने विचारण्यात आला आहे. आरटीआय एक्टिविस्ट साकेत गोखले यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

News English Summary: Many have been shocked to learn that Arnab already knew about the Army’s secret operations. Therefore, it is being linked directly to the Ministry of Defense and National Security Advisors of the Government of India. Therefore, RTI has directly asked whether the Defense Ministry was aware that Arnab was aware of the Balakot strike. RTI activist Saket Gokhale has raised this question.

News English Title: RTI activist Saket Gokhale asked question under RTI regarding Arnab Goswami having Balakot strike information in advance news updates.

हॅशटॅग्स

#RajnathSingh(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x