19 April 2024 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे - राज ठाकरे

MNS Chief Raj Thackeray, Gram panchayat result

मुंबई, २० जानेवारी: शहरी भागातील पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या अशी सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ३६ जागी विजय मिळविला आहे. ही निवडणूक गाजली ती राज्यातील मोठ्या पक्षांनी ग्रामपंचायतींना दिलेल्या मोठ्या निधी वचनाची. मात्र याबाबतीत मनसेच्या उमेदवारांकडे कोणतीही अर्थशक्ती नसताना देखील पक्षाने चांगली कामगिरी केल्याचं मान्य करावं लागेल. कारण ग्राम पंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेणं हा नक्कीच धाडसी निर्णय होता. तो देखील राज्यातील ३ प्रमुख पक्ष एकत्र आणि भाजप सारखा श्रीमंत पक्ष समोर असताना. यामध्ये सर्वात प्रथम दखल घ्यावी लागेल ती यवतमाळ मधील राजू उंबरकर यांच्या कामगिरीची.

कारण यवतमाळमध्ये मनसेला सर्वाधिक यश मिळाले आहे. येथील वणी मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील 15 ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेने जिंकलेल्या 15 ग्रामपंचायतींमध्ये शिरपूर, मोहूर्ली, येनक, खांदला, खांदला, चंडकापुर, बाबापूर, मोहदा, शिंदी, माहागाव , गदाजी बोरी, करणवाडी या गावांचा समावेश आहे.

 

News English Summary: Maharashtra Navnirman Sena, known as an urban party, has started setting foot in rural areas through Gram Panchayats. Reacting to this result, Raj Thackeray said, “Congratulations from the bottom of my heart to all the Maharashtra soldiers who have won the Gram Panchayat elections.” Make the most of the opportunity you have to do something good for your village. I will see you all soon. Raj Thackeray has instructed the workers to be careful.

News English Title: MNS Chief Raj Thackeray talked on gram panchayat result news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x