आज शेतकरी पराभूत झाला तर भविष्यात या तानाशाही सत्तेपुढे कोणीही आवाज उठवणार नाही
नवी दिल्ली, २९ जानेवारी: मागील दोन महिन्यांपासून शांततेत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारीला हिंसक वळण लागलं आणि विषय सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर उत्तर प्रदेश आणि केंद्रातील मोदी सरकारने प्रशासकीय पातळीवर संपूर्ण आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी आंदोलक असलेल्या ठिकाणी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना मॅनेज करून स्थानिकांचा शेतकऱ्यांना विरोध असल्याचं भासविण्यात आलं. वास्तविक हीच स्थानिक लोकं मागील दोन महिने शेतकऱ्यांना पाणी आणि खाण्यापिण्याची सोय करत होते.
शेतकरी नेत्यांवर FIR करून त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याची देखील रणनीती आखण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यासाठी पोलिसांना थेट राकेश टिकैत यांच्याकडे पाठवून आंदोलन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र राकेश टिकैत यांनी केलेल्या भावुक भाषणानंतर संपूर्ण वातावरण पुन्हा पलटू लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकूण मोदी सरकारची दडपशाही पाहता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सामान्य लोकांनाच भविष्याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
याबतात ट्विट करताना राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे की, “जर आज शेतकरी पराभूत झाला तर भविष्यात या तानशाही सरकारपुढे आवाज उठविण्याची कोणीही हिम्मत करणार नाही…किसान जिंदाबाद
रात्री उशिरा पोलिसांनी टिकेत यांना समजवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांनी आंदोलनस्थळ सोडण्यास नकार दिला. माध्यमांशी संवाद साधताना टिकेत यांना अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांसोबत विश्वासघात झाला आहे. तिन्ही कायदे मागे न घेतल्यास आत्महत्या करेन, असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर टिकेत यांनी उपोषण सुरू केलं. यानंतर आंदोलनस्थळावरील परिस्थिती बदलली. राकेश टिकेत यांचे बंधू नरेश टिकेत यांनी आंदोलन संपणार नसल्याची घोषणा मुझफ्फरपूरमध्ये केली.
त्यानंतर नरेश टिकेत यांनी महापंचायतीची घोषणा केली. रातोरात पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणाच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन गाझीपूर सीमा गाठली. सीमेवरील परिस्थिती बदलताच पोलिसांचा पवित्रादेखील बदलला. त्यांना कारवाईला स्थगिती दिली. याशिवाय खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत केला गेला. सध्याच्या घडीला राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. गेल्या काही तासांत गाझीपूर सीमेवरील वातावरण पूर्णपणे बदललं आहे.
News English Summary: If the farmer loses today, no one will be able to dare to raise his voice against such a dictatorial government in the future. Kisan Zindabad said farmers leader Rakesh Tikait.
News English Title: Farmers leader Rakesh Tikait criticised Modi government behaviour with protesting farmers news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली
- Numerology Horoscope | 15 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार?
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा