25 April 2024 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

VIDEO | सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांविरोधात धुडगूस घालणारे गुंड घुसवले जातं आहेत

Delhi Sindhu border, farmers protestant, Danger zone

नवी दिल्ली, २९ जानेवारी: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला धार चढली आहे. सरकार पोलीस प्रशासनाच्या मदतीने शेतकरी आंदोलन दडपत आहे, असा गंभीर आरोप राकेश टिकैत यांनी केला होता. सरकार आणि पोलिसांच्या दबावामुळे संयमाचा बांध फुटलेल्या राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाले. हेच अश्रू खचलेल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा उमेद देणारे ठरले आहेत. गाझीपूरमध्ये शेतकरी पुन्हा एकवटण्यास सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे शेतकरी आंदोलकांचा निषेध करणारी गर्दी इथे जमा झालेली दिसतेय. या गर्दीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर दगडफेक केली तसंच त्यांचे तंबूही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. सिंघू सीमा गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलनाचं मुख्य स्थान बनलंय. कृषी कायद्याविरोधात जमलेल्या हजारो शेतकऱ्यांनी इथे ठाण मांडलंय.

विशेष म्हणजे सिंधू सिमेच्या अनेक कोपऱ्या कोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर गुंड तोंड झाकून आत शिरत असल्याचं रेकॉर्ड झालं आहे. त्यातील अनेकांना प्रसार माध्यमांनी विचारणा केली, पण त्यांनी दुरूनच निघून जाणं पसंत केलं. त्यामुळे येथे शेतकऱ्यांविरोधात स्थानिकांचा रोष असल्याच्या बातम्या पेरून मोठं षढयंत्र रचल्याचे निदर्शनास येत आहे.

 

News English Summary: The tears of farmer leader Rakesh Tikait have once again sharpened the farmers’ movement. Rakesh Tikait had made a serious allegation that the government was suppressing the farmers’ agitation with the help of the police administration. Rakesh Tikait, who lost his temper due to pressure from the government and the police, shed tears. These are the tears that have rejuvenated the farmers. In Ghazipur, farmers have started regrouping.

News English Title: Delhi Sindhu border farmers protestant are in danger zone news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x