20 April 2024 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

लोकांनी पैसे देऊन घेतलेला इंटरनेट डाटा बॅन होतो | त्यांच कंपन्यांच्या कंट्रोलमध्ये ‘आटा’ गेल्यावर...

AAP party, MP Bhagwant Mann, Disconnecting internet, Farmers protest

नवी दिल्ली, ०५ फेब्रुवारी: केंद्रानं लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आता शेतकरी आंदोलन आता तापलंय. सद्यस्थितीत सरकारशी चर्चा करणं शक्य नाही, असं शेतकरी संघटनांनी स्पष्ट केलंय. जेव्हापर्यंत निर्दोष शेतकऱ्यांवर आणि शेतकरी नेत्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जात नाही, या भागातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरळीत होत नाही तेव्हापर्यंत चर्चेची शक्यताच शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावलीय.

दिल्ली सरकारकडून आम्हाला ११५ लोकांची एक यादी मिळाली आहे. मात्र, अद्याप देखील आमचे एकूण सहा लोक बेपत्ता आहेत, असंही शेतकऱ्यांनी स्पष्ट केलंय. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला आणि दिल्लीच्या इतर परिसरात उसळलेल्या हिंसाचारानंतर अनेक शेतकरी बेपत्ता आहेत.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे वास्तव आणि भव्य स्वरूप सामान्य लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन सुरु असलेल्या भागातील इंटरनेट सेवा ठप्प करण्याचे प्रकार सुरूच ठेवले आहेत. याच विषयाला अनुसरून आपचे खासदार भगवंत मान यांनी मोदी सरकारला लक्ष केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “लोकांनी पैसे मोजून खरेदी केलेला खाजगी डेटा त्यांच्या परवानगीशिवाय बॅन केला जातो…मग विचार करा जर याच कंपन्यांच्या नियंत्रणाखाली “आटा” आला तर काय होईल…

 

News English Summary: The farmers’ agitation is now heating up against the three agricultural laws implemented by the Center. At present, it is not possible to discuss with the government, the farmers’ organizations have clarified. Until the charges against innocent farmers and farmer leaders are withdrawn, the possibility of a discussion is ruled out by the farmers’ leaders until the internet service in the area is restored.

News English Title: AAP party MP Bhagwant Mann slams Modi govt over disconnecting internet during farmers protest news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x