29 March 2024 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार?
x

भाजप-शिवसेना सरकार असताना संभाजीनगर का केलं नाही? - राज ठाकरे

MNS Chief Raj Thackeray, Aurangabad, Sambhajinagar, Shivsena BJP

मुंबई, ०६ फेब्रुवारी: औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. भाजप आणि मनसेनं आक्रमक पवित्रा घेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे. अशावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. जेव्हा केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार होतं, तेव्हा का नामकरण केलं नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

या मुद्द्यावर बोलाताना राज ठाकरे म्हणाले, एकूणच या सर्व प्रकरणात भाजपा असेल किंवा शिवसेना ज्यावेळी केंद्रात व राज्यात अशआ दोन्ही ठिकाणी सत्ता होती, त्यावेळी हे नामांतर का नाही झालं? आज तुम्ही कसंल राजकारण करत आहात? इतर अनेक शहरांची नावं बदलल्या गेली. दिल्लीत रस्त्यांची नावं बदलली गेली. मग केंद्रात व राज्यात तुमचंच सरकार होतं. तर त्यावेळी औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं? याचं उत्तर भाजपा व शिवसेनेनं द्यावं. लोकांना काय वेडं समजतात का? निवडणुकीच्या तोंडावर बरोबर संभाजीनगरचा विषय आणला जातो. इतकी वर्ष का नाही केलं? थांबवणारं कुणीच नव्हतं.

दरम्यान, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ असं करण्याचा अल्टिमेटम मनसेने शिवसेनेला दिला होता. हा अल्टिमेटम संपला तरी राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना मनसे कार्यक्रर्त्यांनी गुरुवारी घेराव घातला. त्याचवेळी मनसे सैनिकांनी शिवसेनेच्या निषेधाची पत्रकं खैरे यांच्या अंगावर फेकून दिली. यावेळी मनसे सैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी,’ आणि ‘धिक्कार असो, धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा दिल्या होत्या.

 

News English Summary: The issue of naming Aurangabad city as Sambhajinagar is currently being politicized. BJP and MNS have taken an aggressive stance and started an agitation to name Aurangabad as Sambhajinagar. In such a situation, MNS president Raj Thackeray has strongly targeted BJP and Shiv Sena. When there was a BJP-Shiv Sena government at the Center and in the state, why was it not named? This question has been asked by Raj Thackeray.

News English Title: MNS Chief Raj Thackeray criticised BJP and Shivsena over Aurangabad renaming to Sambhajinagar issue news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x