23 April 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय? GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

शेतकरी आंदोलनात शेतकरी मृत्यूमुखी पडले तेव्हा मोदींचे अश्रू बाहेर पडले नाहीत

Shivsena, MP Sanjay Raut, PM Narendra Modi, Delhi Farmers protest

मुंबई, १० फेब्रुवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (१० फेब्रुवारी) राज्यसभेला संबोधित केले. काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह ४ खासदारांना निरोप देताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केले. त्याचसोबत गुलाम नबी आझाद यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेवरून नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचे दिसून आले. यावर, नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच भावूक झाले नाहीत, यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.

मोदी आतापर्यंत 5 ते 7 वेळा ते भावनिक झाले आहेत. दिल्लीत मागील अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतायत, अनेक शेतकरी यामध्ये मृत्युमुखी पडले, तेव्हा त्यांचे अश्रू बाहेर पडले नाहीत, असं राऊत यांनी म्हटलंय. पुढे राऊत म्हणाले की, पेट्रोल डिझेल दरवाढ झाल्यानंतर यापूर्वी अनेकदा भाजपच्या नेत्यांनी आंदोलनं केली. आता आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला आंदोलनजिवी म्हटलं जातं. आमच्यावर टीका केली जाते. भाजप दिल्लीत पोहोचला तो आंदोलनाच्या माध्यमातूनच. आज विरोधी पक्ष आंदोलन करत असताना टीका करतात, असं ते म्हणाले.

भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी केलेले ट्विट्स हे लोकांना जनतेविरोधी वाटत असतील आणि राज्य सरकार त्यांची चौकशी करणार असेल तरी यामध्ये चूक काय आहे ? यावर आता भाजपच्या लोकांनी आंदोलन करणार असल्याचे सांगितले. आंदोलन करणे इतकं मोठी चूक काय झाली. भाजपच्या या लोकांची तक्रार आम्हाला आता नरेंद्र मोदींकडे करावी लागणार आहे. कारण एकीकडे नरेंद्र मोदी म्हणतात आंदोलन करू नका आणि महाराष्ट्रातील भाजपचे लोक आंदोलन करण्याची भाषा करतात. त्यामुळे भाजपच्या लोकांची तक्रार आम्हाला आता नरेंद्र मोदींकडे करावी लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi addressed the Rajya Sabha yesterday (February 10). While bidding farewell to Congress MP Ghulam Nabi Azad and 4 other MPs, Narendra Modi lauded senior Congress leader Ghulam Nabi Azad. At the same time, an incident with Ghulam Nabi Azad showed that Narendra Modi was emotional in the House. This is not the first time Narendra Modi has become emotional over this, it has happened many times before, said Shiv Sena leader Sanjay Raut.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut target PM Narendra Modi over Delhi Farmers protest news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x