25 April 2024 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मोदी सरकारने डिझेलच्या करातून कमावलेले २१ लाख कोटी - काँग्रेस

The government, 21 lakh crore, Petrol Tax

मुंबई, २२ फेब्रुवारी: काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ सुरू आहे. तर काही शहरांमध्ये पेट्रोल शंभरी पार केले गेले आहे. तर अनेक शहरांमध्ये पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर आहे. पेट्रोलच्या दरात सुरू असलेली वाढ अशीच वाढत राहिल्यास अनेक शहरांमध्ये पेट्रोल शतक गाठेल, अशी परिस्थिती आहे.

याचाच धागा पकडत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून केंद्रातल्या केंद्र सरकारला लक्ष केले आहे. याबाबत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिले आहे. त्या म्हणतात, “गेल्या साडे सहा वर्षांत सरकारने डिझलवरचं उत्पादन शुल्क ८२० टक्क्यांनी तर पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क २५८ टक्क्यांना वाढवलं.”

अशा प्रकारे सरकारने जनतेकडून २१ लाख कोटी रुपये कमावले. हा पैसा त्या लोकांपर्यंत गेला पाहिजे ज्यांच्यासाठी तो गोळा करण्यात आला,” असल्याचे पुढे पत्रात सोनिया गांधी यांनी म्हंटले आहे. लोकांच्या त्रासातून फाय़दा कमवत असल्याचा आरोप केला आहे. ईंधन आणि गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला त्रास होत आहे. हे सांगण्यासाठीच मी तुम्हाला पत्र लिहित असल्याचे सोनिया यांनी म्हटले आहे. याचबरोबर सरकारने हे वाढते दर मागे घ्यावेत आणि सामान्य, नोकरदार, शेतकरी, गरिबांना याचा फायदा पोहोचवावा, अशी मागणी केली आहे.

 

News English Summary: The government earned Rs 21 lakh crore from the people. The money should go to the people for whom it was collected, ”Sonia Gandhi said in the letter. He is accused of benefiting from the suffering of the people. Rising fuel and gas prices are hurting every citizen of the country. “I am writing to you to tell you this,” she said. At the same time, the government has demanded that the rising rates be reversed and that the common man, the working class, the farmers and the poor benefit from it.

News English Title: The government earned Rs 21 lakh crore from the people through petrol productions fess news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x