23 April 2024 7:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

केंद्राच्या सोशल मीडिया मार्गदर्शन सूचना | 'त्या' नियमामुळे व्हाट्सअँप भारतात बंद होईल?

Dispute, WhatsApp Policy, Central government Guidelines

नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी: केंद्रीय आयटी व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. यावेळी रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया कंपनी भारतात व्यवसाय करू शकते. पण त्याचा गैरवापर होता कामा नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. सोशल मीडियावरुन अनेक वेळा चुकीची माहिती पसरवली जाते. यामुळे सुसंस्कृत समाजात तेढ निर्माण होत आहेत. अशा तक्रारीही समोर आल्या आहेत.

रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, नियमांचं उल्लंघन करून समाज माध्यमांवर गोष्टी व्हायरल केल्या जात आहेत. व्यवसाय करण्यासाठी समाज माध्यमांचं भारतात स्वागत आहे. पण सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्लॅटफॉर्म असावा. द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. दहशतवादी सोशल मीडियाचा वापरही करत आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये मंत्र्यांनी काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

मात्र समाज माध्यमांसाठीच्या मार्गदर्शन सूचनांपैकी एक महत्वाची सूचना केंद्रानं केली आहे. ती म्हणजे समाज माध्यमांवर एखादा गैरप्रकार घडल्यास त्याची सुरुवात कुणी केली याची माहिती कंपनीला द्यावी लागेल. सरकारची हीच सूचना व्हाट्सअँप’साठी डोकेदुखी ठरणारी आहे.

व्हाट्सअँपने याआधीच आमचं प्लॅटफॉर्म हे ‘एण्ड टू एण्ड इन्स्क्रिप्टेड’ (end to end encryption) असल्यानं मेसेज कुणी केलाय किंवा नेमकं काय संभाषण झालं हे सांगणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. युझर्सच्या वैयक्तिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एण्ड टू एण्ड इन्स्क्रिप्टेड प्रणालीवरच आमचं व्यासपीठ कार्य करतं, असं WhatsApp ने जाहीर केलं होतं.

केंद्र सरकारने याआधीही व्हाट्सअँपकडे व्हायरल आणि फेक मेसेजेसची सुरुवात कुठून होते याची माहिती देण्यासाठीची मागणी केली होती. पण ते शक्य नसल्याचं व्हाट्सअँपनं स्पष्ट केलं होतं. त्यावरुन व्हाट्सअँप आणि केंद्र सरकारमध्ये वादही झाले होते. केंद्र सरकार आता मेसेजसचं उगम स्थान माहित करुन घेण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे.

तर व्हाट्सअँपनं तांत्रिकदृष्ट्या दोन संभाषणांमधली माहिती काढून घेणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे व्हाट्सअँपनं आता केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना पाळण्यास असमर्थता दाखवली तर पुढे काय होणार? भारतात व्हाट्सअँप बंद होणार का? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान, केंद्राच्या नव्या मार्गदर्शन सूचनांबाबत अद्याप व्हाट्सअँप’कडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

 

News English Summary: WhatsApp has already said that since our platform is ‘end to end encryption’, it is impossible to say who sent the message or what the conversation was about. WhatsApp had announced that our platform works on an end-to-end inscribed system from the point of view of users’ personal security. The central government had earlier asked WhatsApp to provide information on where viral and fake messages originate from. But WhatsApp had made it clear that it was not possible. This led to a dispute between WhatsApp and the central government. The central government is now adamant on finding out the origin of the messages.

News English Title: Dispute between WhatsApp and the central government news updates.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x