29 March 2024 1:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

अंधेरी पूल दुर्घटना: जीवन ज्योत प्रतिष्ठाणचा रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या 'त्या' कामगारांना मदतीचा हात

मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना घडल्यानंतर अनेक कामगार रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी भर पावसात राबताना दिसत आहेत. परंतु त्यात आता माणुसकीच दर्शन घडविणाऱ्या घटना सुद्धा दिसू लागल्या आहेत. भर पावसात रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या कामगारांसाठी मुरजी पटेल यांच्या जीवन ज्योत प्रतिष्ठाण या समाजसेवी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे.

भर पावसात रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या कामगारांसाठी जीवन ज्योत प्रतिष्ठाणने खाण्या-पिण्याच्या वस्तू प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पुरविल्या आहेत. दिवसभर मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम असून त्यात भर म्हणजे अनेक व्हीआयपी प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देत असल्यामुळे, प्रत्यक्ष ठिकाणी राबणाऱ्या कामगारांकडे कोणाचे लक्ष जात नव्हते. परंतु प्रत्यक्ष घटनास्थळाच्या भेटी दरम्यान भाजपचे नगरसेवक असलेले मुरजी पटेल यांच्या ते निदर्शनास येताच, त्यांनी पुढाकार घेऊन त्या कामगारांना जीवन ज्योत प्रतिष्ठाण तर्फे मोफत खाण्यापिण्याच्या वस्तूंची त्याच ठिकाणी सोया करून दिली, तेव्हा कामगारांचा जीव भांड्यात पडला असं दिसत होत.

दुर्घटना घडली असली तरी सध्या ही वेळ रेल्वेसेवा लवकरात लवकर पूर्ववत कशी करता येईल हे महत्वाचे आहे. ज्यामुळे लाखो प्रवाशांचा खोळंबा होणार नाही आणि आजचा दिवस जरी मुंबईकरांना खूप दगदगीचा गेला असेल तरी लवकरात लवकर रेल्वेसेवा पूर्ववत कशी करता येईल यावर प्रशासनाचा भर आहे. कारण उद्या मुंबईकर पुन्हा आपल्या दैनंदिन कामासाठी पुन्हा घराबाहेर निघेल आणि त्याआधी रेल्वेसेवा पूर्ववत होणे गरजेचे आहे. अशावेळी जीवन ज्योत प्रतिष्ठाण सारख्या समाजसेवी संस्थेचा खारीचा वाटा सुद्धा महत्वाचा ठरतो.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x