19 April 2024 9:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

रोखठोक! खड्डेयुक्त आयुष्याला स्वतः मुंबईकर-ठाणेकर जवाबदार? या सत्ताधारी पक्षांना एकजुटीने अद्दल घडविणे गरजेचे!

मुंबई : मुंबई, ठाणे असो वा कल्याण-डोंबिवली येथील प्रवाशांची अवस्था म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी झाली आहे. या शहरातील रस्त्यांच्या अवस्था आणि दर्जा पाहिल्यास, त्यावरून प्रवास करण म्हणजे स्वतःचा आणि प्रियजनांचा मजबुरी म्हणून रोज जीव धोक्यात घालणे असाच म्हणावा लागेल. परंतु स्वतःची अवस्था अशी का झाली आहे याचा कधी गंभीर होऊन या शहरातील लोकांनी प्रामाणिक विचार केला आहे का?

आम्ही उपस्थित केलेले प्रश्न;
१. मुंबई, ठाणे असो वा कल्याण-डोंबिवली मधील किती कुटुंबांनी आपले प्रियजन या हीन दर्जाच्या रस्त्यांवर गमावले आहेत?
२. किती लोकांनी स्वतःच्या शाररिक व्याधींना याच रस्त्यांवरून रोजच्या प्रवासादरम्यान जन्म दिला आहे?
३. किती लोकांनी याच हीन दर्जाच्या रस्त्यांवरून प्रवास करताना कायमचे अपंगत्व स्वीकारलं आहे?
४. किती लोकांनी स्वतःच्या मेहनतीने विकत घेतलेल्या वाहनांचा चुराडा याच हीन दर्जाच्या रस्त्यांवर केला आहे?

सामान्य शहरवासीयांच्या याच सहनशक्तीचा हे राजकीय पक्ष वर्षानुवर्ष फायदा उचलत राहतात आणि प्रशासनाच्या भ्रष्ट नीतीतून स्वतःचे खिसे भरत असतात. नित्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे होणारा रोजचा त्रास आणि प्रवासातील रोजच्या यातना सामान्य शहरवासी सहज विसरतो आणि पुन्हा त्याच पक्षांना मतदान करण्यासाठी मोठ्या उत्साहाने सज्ज होतो. शहरवासीयांची हीच वृत्ती भ्रष्ट पक्ष आणि नेते मंडळींना अजून प्रोत्साहन देत असते आणि तेच चक्र वर्षानुवर्षे सुरु असतं.

या शहरातील मतदारांची ही पारंपरिक पद्धतीने एखाद्या विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधून घेण्याची वृत्तीच या न बदलणाऱ्या परिस्थितीला जवाबदार आहे. त्या रस्त्यावरून आपला प्रियजन गमवू, कायमचा अपंग करू, कायमच्या शारीरिक व्याधी ओढवून घेऊ आणि लाखो रुपयांच्या गाड्यांचा चुराडा करून घेऊ, परंतु पुन्हा मतदान मात्र त्याच पक्षाला पारंपरिक पद्धतीने करू, जो या सर्व घटना आणि परिस्थितीला जवाबदार आहे. विषयाच मूळ कशात आहे हे सामान्यांना न उमगल्यानेच या शहरांतील पायाभूत सुविधांचे धिंडवडे निघाले आहेत. हजारो करोड रुपयांचे वार्षिक बजेट असणाऱ्या या महापालिकेतील पैसा नक्की जातो तरी कुठे हे सामान्य शहरवासीयांनी कधी प्रामाणिकपणे समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही.

आजचा आलेला दिवस कसातरी जीव मुठीत घेऊन ढकलून, शहरवासी स्वतःच स्वतःचा भविष्यकाळ भीषण करून घेत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे थांड मांडून बसलेल्या त्या पक्षांना आणि प्रतिनिधींना शहरवासीयांनी एकजुटीने धडा शिकविणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास पुन्हा तेच ‘ये रे माझ्या मागल्या’ हीच परिस्थती अजून अनेक वर्षे कायम राहणार यात काडीमात्र शंका नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x