20 April 2024 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार हे जाहीर होताच अचानक मोदींनी जनतेला संबोधित केलं? - सविस्तर वृत्त

Maharashtra Lockdown

नवी दिल्ली, २१ एप्रिल: काेरोनावर मात करताना अर्थव्यवस्था ढासळू नये म्हणून केंद्र ३० एप्रिलनंतर मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. प. बंगाल विधानसभा व उप्र पंचायत निवडणुका २९ रोजी संपत आहेत. यानंतर तत्काळ निर्णय लागू होऊ शकतात. गेल्या लॉकडाऊनचा अनुभव पाहता यासाठी नवीन मॉडेल तयार केले जात आहे. ४० कोटी लोकांना लसीचे कवच देऊन वाहतुकीचे निर्णय मंत्रालये घेतील. २९ एप्रिलपासूनच याची अंमलबजावणी होऊ शकते.

गेल्या वर्षी २९ जूनपासून सुरू झालेल्या अनलॉक-२ च्या मॉडेलची पुन्हा अंमलबजावणी होऊ शकते. त्यात अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू राहण्यासाठी आवश्यक बाबी कठोर दिशानिर्देशांसह सुरू करण्यात आल्या होत्या. सर्व अनावश्यक बाबींवर निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. या मोहिमेची जबाबदारी एका टास्क फोर्सकडे सोपवली जाऊ शकते.

रात्रीचा कोरोना कर्फ्यू देशभर लागू होऊ शकतो
केंद्र सरकार रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत देशभरात कोरोना कर्फ्यू लावू शकते, पण आवश्यक गोष्टींना सूट राहील. रेल्वे, बस, विमानाने, कारखान्यांतून परतणाऱ्यांना घरी जाण्यासाठी ऑटो-टॅक्सी सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

देशातील पहिल्या लॉकडाऊनवेळेची चूक;
देशात पहिला लॉकडाऊन जाहीर करतेवेळी मोदी सरकारने कोणतेही पूर्वनियोजन केलं नसल्याचं सिद्ध झालं होतं. तसेच मोदी सांगत असले तरी मोदींनी लॉकडाऊन जाहीर करताना उशीर केला होता हे देखील वास्तव आहे. मात्र आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात सर्वच राज्यांमध्ये स्थिती गंभीर होतं असताना स्मशान भूमी आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधा देखील अपुऱ्या पडत आहेत. मात्र संपूर्ण देशात महाराष्ट्र सरकार पूर्व नियोजन करून केंद्राची वाट न पाहता योग्यवेळी निर्णय घेत असल्याने मोदी सरकारची भविष्यात कोंडी होऊ शकते आणि त्यात निवडणुका असल्याने पुढचे १० दिवस कसे मारून घ्यायचे असा पेच केंद्राकडे निर्माण झाला आहे, कारण देशात १० दिवसानंतर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे. मात्र राज्य सरकार आधीच निर्णय घेत असल्याचं दिसल्याने मोदी लगेच LIVE आल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना स्थितीच्या संदर्भाने संवाद साधला. ते म्हणाले, लॉकडाऊन अंतिम पर्याय असायला हवा. देशातील कोरोना स्थिती चिंताजनक होत चालली आहे. याच मुद्द्याला धरून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ‘लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी भूमिका मांडत लॉकडाऊन नको, असा सल्ला दिला आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता महाराष्ट्रात लॉकडाऊन बाबत राज्यसरकार आपला निर्णय रद्द करणार की कायम ठेवणार याकडे लक्ष लागले आहे.

राज्यात कोरोनाची वाढती संख्या कमी होत नाही आहे. या सर्व गोष्टी पाहता राज्य सरकारने आजपासुन कडक लॉकडाऊन लागू होणार असे संकेत दिले होते. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला असेही काल काही मंत्र्यांनी सांगितले. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आले. ही घोषणा होते न होते तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं आहे.

यात लॉकडाऊन देशाला परवडणारे नाही, त्यामुळे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा, अशी भूमिका जाहीर केली. त्याच बरोबर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून ठेवा ही भूमिका घेतली आहे. या सर्व बाबी पाहता राज्यसरकार स्वतःचा लॉकडाऊन बाबत घेतलेल्या निर्णय वर ठाम राहत का ? याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.

राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्वाधिक दैनंदिन मृत्यू महाराष्ट्रात आहेत, अशा परिस्थितीत राज्यात ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरची कमतरता भासत आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लावावा याबाबत सर्व मंत्र्यांनी आग्रही भूमिका घेतली. अखेर मंत्रिमंडळात याबाबत निर्णय झाला आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोदींच्या संवादातील मुद्दे;

  1. राज्यांना आवाहन… देशाला लॉकडाऊनपासून देशातील नागरिकांनी मिळून वाचवायचे आहे. आता कंटेनमेंट नव्हे, मायक्रो कंटेनमेंट झोन करून देश वाचवायचा आहे.
  2. कामगारांना आवाहन… तुम्ही सध्या जेथे आहात तेथेच थांबा. राज्य सोडू नका. या कामगारांचा रोजगार थांबणार नाही याची राज्यांनी त्यांना हमी द्यावी. या सर्वांना येथेच लस दिली जाईल.
  3. युवकांना… आपल्या घरी, शेजारी टास्क फोर्स म्हणून काम करा. कोविड प्रोटोकॉल पाळण्यासाठी कुटुंबाला सातत्याने आठवण करून द्या.
  4. राम आणि रमजान… मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा संदेश आहे की, आपण मर्यादांचे पालन करायला हवे. रमजान सुरू आहे, यातून संयम राखण्याची शिकवण मिळते.
  5. लक्ष्य : लसीकरण आणि अर्थव्यवस्था सावरावी
  6. पद्धत : गावात गर्दीची ठिकाणे नियंत्रित करणे
  7. ध्येय : साखळी तोडून या संसर्गावर नियंत्रण

 

News English Summary: The Center is preparing to take major decisions after April 30 so that the economy does not collapse while overcoming Carona. W. Bengal Assembly and Upper Panchayat elections are coming to an end on the 29th. Immediate decisions can then be made. A new model is being created based on the experience of the last lockdown. Ministries will take transport decisions by vaccinating 40 crore people. It can be implemented from April 29.

News English Title: Maharashtra CM Udhav Thackeray may announce lockdown today over corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x