23 April 2024 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

मंदिर आणि धर्मावर चर्चा करुन देशात रोजगार निर्मिती होणार नाहीये: सॅम पित्रोदा

गांधीनगर : मला भारताची खरंच चिंता वाटू लागते जेव्हा मी देशात मंदिर, धर्म, जात, देव अशा विषयांवर वादविवाद आणि संघर्ष पाहतो. देशात रोजगार निर्मिती ही कोणत्याही धर्मामुळे नाही तर केवळ विज्ञानच भविष्याची निर्मिती करु शकतं असं ठाम मत भारताच्या मोबाइल क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा यांनी केलं आहे.

सॅम पित्रोदा यांनी गांधीनगर येथील एका विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे. आपण जेव्हा कधी रोजगारासंबंधी चर्चा करतो तेव्हा त्याला लगेचच राजकीय रुप दिलं जातं अशी खंत सुद्धा त्यांनी संवादादरम्यान व्यक्त केली आहे. देशाचे भविष्य हे विज्ञानावर आधारित असत आणि फक्त विज्ञानामुळेच देशाचं भविष्य घडू शकत, परंतु दुर्दैवाने सार्वजनिक ठिकाणी विज्ञानावर फार कमी चर्चा होत असल्याची खंत सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केली.

देशातील तरुणांकडून जेव्हा रोजगारासंबंधी चर्चा होते तेव्हा विशेषकरून राजकारण्यांकडून भरकटवलं जात. निरुपयोगी गोष्टी सांगून तरुणांना चुकीच्या मार्गावर ढकलले जात आहे असं सनसनाटी आरोप सुद्धा त्यांनी केला. नेते मंडळी अशा विषयांवर बोलत असतात ज्यांना काहीच अर्थ नसतो, कारण संपूर्ण आयुष्यात त्यांनी भाषण देण्याव्यतिरिक्त समाजासाठी दुसरं त्यांनी काहीच केलेलं नसतं. त्यामुळे तरुणांना मार्गदर्शन करण्याची त्यांची योग्यता नाही असं सॅम पित्रोदा बोलले आहेत. त्यानाच एकूणच रोख हा देशातील सध्याच्या राजकीय वातावरणावर होता असं जाणवत होत.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x