25 April 2024 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

अंध सरकारला खड्डे दिसत नसतील तर, जनतेसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांची आंदोलन दिसणारच

नवी मुंबई : नुकताच बांधला गेलेला सायन-पनवेल हायवेची एकाच पावसाने अक्षरशा दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांच प्रमाण इतकं भयंकर वाढलं आहे की तासंतास प्रवाशांचा ट्रॅफिकमध्ये खोळंबा होत आहे. त्यात सरकारला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे अखेर राज्य सरकारच्या पीडब्लूडी अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तुर्भे कार्यालयाची मनसेच्या नवी मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांनी तोडफोड केली असून झोपलेल्या सरकारी यंत्रणेला जाग आणण्याचा आक्रमक प्रयत्नं केला आहे.

सायन पनवेल हायवे हा वाहतुकीसाठी खूप महत्वाचा समाजाला जातो आणि त्याच नवीन रस्त्याची एकाच पावसाने केलेली दुर्दशा प्रत्येक प्रवासी डोळ्याने बघून राग व्यक्त करत आहे. त्यामुळे या मोठ्या प्रमाणावरील खड्ड्यांचा परिणाम असा की वाहतूक खूपच धिम्यागतीने होत असून प्रवाशांचा तासंतास या प्रवासात खोळंबा होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा प्रचंड नाराजी आहे. त्यात सरकारी यंत्रणा सुद्धा कोणतीही जवाबदारी स्वीकारायला तयार नसल्याने हे खड्डे बुजवणार तरी कोण असा प्रश्न पडला असताना, आज अखेर झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भे कार्यालयावर तोडफोड करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

यात नवी मुंबईमधील नितीन खानविलकर, नितीन चव्हाण, राजू खाडे, विशाल भिलारे, श्याम ढमाले या महाराष्ट्र सैनिकांनी सहभाग घेतल्याचे समजते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिल की,’जर सरकारला रस्त्यांवरील खड्डे दिसत नसतील तर सामान्य जनतेसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांची आंदोलनं ही दिसणारच’. माझे कार्यकर्ते सामन्यांच्या प्रश्नांसाठी झोपलेल्या सरकारला जागं करत आहेत असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांची पाठराखण केली आहे.

मागील आठवडाभर झालेल्या पावसाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या महापालिकांच्या क्षेत्रातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे आणि त्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांनी अनेकांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात सुद्धा सरकारविरुद्ध चीड असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x