19 April 2024 7:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

देशात तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम बंदी?

facebook whatsapp and Instagram

नवी दिल्ली : देशात जर कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाच तर थेट फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडियांवर बंदी आणण्याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती आहे. कारण तणावाच्या काळात अफवांचा सुळसुळाट वाढतो आणि अशावेळी परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून केंद्र सरकार यावर गंभीरपणे विचार करत आहे.

सोशल मीडियामुळे जर थेट राष्ट्रीय सुरक्षा किंवा नागरी सुरक्षेला धोका होत असेल तर सरकार अशा परिस्थितीत सोशल मीडियाचे सर्व अकाऊंट ब्लॉक करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासंबंधित माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी चर्चा सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याअनुषंगाने १८ जुलै रोजी टेलिकॉम ऑपरेटर, भारती इंटरनेट सेवा प्राधिकरण तसेच सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया आदी दूरसंचार कंपन्यांना पत्र पाठवलं असून सोशल मीडियावरील बंदी बाबतची विचारणा केली असून काही हरकती सुद्धा मागविल्या आहेत. तसेच विधी विभागाशी सुद्धा संवाद सुरु आहे.

केंद्र सरकारला माहिती व तंत्रज्ञान कायदा ६९ ए अंतर्गत सोशल मीडियावर निर्बंध घालण्याचा सरकारला अधिकार असल्याचंही सरकारने या पत्रात म्हटलं आहे. भारतात समाज माध्यम वापरणारे करोडो लोकं आहेत आणि त्यामुळे अनेक चुकीचे प्रकार घडण्याच्या घटना सुद्धा समाज माध्यमांवर दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. समाज माध्यमांचा सर्वाधिक वापर हा अफवा पसरविण्यासाठी केला जातो असं सरकारच म्हणणं आहे.

 

News English Summery: It is known that the central government is seriously considering banning social media like Facebook, WhatsApp, Instagram and Telegram if serious law and order issues arise in the country. Because in times of stress, rumors are swirling and the central government is seriously considering to keep the situation under control. If social media directly threatens national security or civil security, the government plans to block all social media accounts in such cases. Preliminary information is under discussion with the Ministry of Information and Technology. Accordingly, on July 18, telecommunication operators, the Bharti Internet Service Authority and the Cellular Operators Association of India sent a letter to telecommunication companies asking about the ban on social media and some objections. Communication with the Legal Department is also underway.

 

Web News Title: Central government considering on banned over facebook whatsapp and Instagram.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x