19 April 2024 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

'पाणी अडवा, पाणी जिरवा’ घोषनेच ‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’ झाल्याने गावांचा विकास रखडला

पुणे : आज पुण्यामध्ये पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान राज ठाकरे यांनी पाण्याबद्दलची जनजागृती जर अमीर खान पार पडणार असेल तर सरकार नक्की काय करत असा प्रश्न उपस्थित केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिउत्तर दिल आहे. उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की,’मागील काही वर्षापूर्वी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ची अशी घोषणा देण्यात आली होती. त्यातून जलसंधारणाची अनेक कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. परंतु, ग्रामीण भागातील गावागावात गट-तट, धर्म-जात अशा विषयांमुळे ‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’ असं होऊ लागलं. तसेच गावातील या कुरघोड्यांमुळे गावांचा खरा विकास रखडला आहे.

परंतु लोकचळवळ शिवाय जलसंधारणाचे काम होऊ शकत नाही. गावागावांमधील गट-तट, जात-पात तसेच राजकीय पक्षांमुळे लोकचळवळ उभी राहण्यात अडचणी येतात. नेमकी हीच गोष्ट पानी फाऊंडेशन ने हेरली आणि त्यावर काम सुरु केले. पुढे फडणवीस असे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य हे अठरा पगड जातीचं सैन्य होतं. महाराजांनी सर्वांना सोबत घेऊनच स्वराज्याची स्थापन केली होती. अमिर खान यांनी सामान्य माणसातील असामान्यत्व जागृत केलं आणि गावातल्या लहान असलेल्या माणसांनी मोठं काम करून परिवर्तन केलं असं प्रशस्ती पत्र सुद्धा दिल.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x