28 March 2024 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर? IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअरवर परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

मोदींना सभागृहात सेनेच्या खासदारांनी नमस्कार केल्यास ते पाहतसुद्धा नाहीत: खासदार कीर्तीकर

नागपूर : पंतप्रधान मोदींना सभागृहात सेनेच्या खासदारांनी नमस्कार केल्यास ते पाहतसुद्धा नाहीत असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मोदींच नाव घेऊन केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांना नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते हे शिवसेनेचे नेते सुद्धा उघड बोलू लागले आहेत.

शिवसेना केंद्र तसेच राज्य सरकारमध्ये सहभागी असली तरी केंद्रात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला नेहमी दुय्यम स्थान देतात असं म्हटलं आहे. सध्या आम्ही भाजप सोबत असलो तरी भविष्यात मात्र शिवसेना हा अपमान कदापि सहन करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार तसेच पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मांडली.

खासदार गजानन कीर्तिकर सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याने नागपुरात शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक तसेच मेळावा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी दिल्लीतील वास्तव आणि भावना कार्यकर्त्यापुढे मांडत असताना हा खुलासा केला. सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर खासदार गजानन कीर्तीकर विदर्भातील अनेक मतदारसंघांना भेट देणार आहेत.

पुढे मेळाव्यादरम्यान त्यांनी सांगितलं की, मोदींच्या या एककल्ली कारभाराचा केवळ शिवसेनेलाच नव्हे तर अकाली दल, टीडीपी या सरकारमधील प्रादेशिक पक्षांनाही आला आणि म्हणूनच टीडीपी अखेर सरकार बाहेर पडले. मित्रपक्षांना दुय्यम वागणूक सहन होत नसल्यानेच प्रादेशिक पक्ष भाजपपासून वेगळे होत आहेत. त्यामुळे आगामी २०१९ ची निवडणूक भाजपसाठी फार कठीण असल्याचं मत व्यक्त करताना आता मोदी लाट केव्हाच संपली आहे असं विधान केलं.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x