26 April 2024 4:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मोठ्या उद्योगांसह फेरीवाले, दुकानदारांनाही कर्ज देणार; मोदी सरकारची घोषणा

India, MSME, kharip crops farmers, Corona Crisis

नवी दिल्ली, १ जून: देशात कोरोनाचं संकट गहिरं होत जातंय. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात रुतलेलं आर्थिक चक्र पुन्हा वर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय मंत्रीमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी आणि नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेमार्फत दिली.

प्रकाश जावडेकर म्हणाले की, एमएसएमईमुळे आपला जीडीपी वाढत आहे. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी एमएसएमईचा मोठा हात आहे. त्यामुळे एमएसएमईसाठी पर्याप्त फंड देण्यात आला असून त्यांच्यासाठी विविध योजनाही राबवण्यात आल्या आहेत. तसेच, लघु आणि मध्यम उद्योगही शेअर बाजारात सूचीबद्ध असणार आहेत.

एमएसएमईमध्ये नव्या नोकऱ्या उपलब्ध होऊ शकणार आहेत. एमएसएमईची मर्यादा आता ५ कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. आजच्या बैठकीत रोजगारवाढीचे निर्णय घेण्यात आल्याचेही जावडेकर म्हणाले. देशात ६ लाखांपेक्षा अधिक एमएसएमई आहेत. त्यामुळे या एमएसएमईमध्ये असणाऱ्या लहान-मोठ्या उद्योगांना उभारी येण्याकरता कर्ज व्यवस्था देण्यात आली आहे. या क्षेत्रातील उद्योगांना कर्ज देण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सलून, पान, आणि छोट्या दुकानादारांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कोरोना काळातील संकटांच्या दृष्टीनं आज मोदी सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मंत्रिमडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नरेंद्र तोमर आणि नितीन गडकरींनी दिली. शेतमालाला मिळणाऱ्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय बैठकीत घेण्याचं तोमर यांनी सांगितलं. ‘मक्याची किमान आधारभूत किंमत ५३ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. तूर, मूग यांची आधारभूत किंमत ५८ टक्क्यांनी वाढवली गेली आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. १४ पिकांच्या किमतीत ५० ते ८३ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचं तोमर म्हणाले.

 

News English Summary: The corona crisis is deepening in the country. Therefore, efforts are being made by the Central Government to revive the economic cycle that was entrenched during the lockdown. Against that backdrop, the Union Cabinet met Prime Minister Narendra Modi today. Some important decisions were taken at this meeting. The decision was announced by Union Ministers Prakash Javadekar, Nitin Gadkari and Narendra Singh Tomar at a press conference.

News English Title: Cabinet approves MSP for 14 kharif crops farmers to get 50 83 percent more than cost News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x