26 April 2024 4:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

सरकारला अर्थव्यवस्थेपेक्षा राजकीय व सामाजिक अजेंडा पूर्ण करण्यातच अधिक रस: रघुराम राजन

former RBI Governor Raghuram Rajan, Modi government, political and social agenda, Economy

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार आहे. सरकारला राजकारण आणि सोशल अजेंडे राबवण्यात अधिक रस असून त्यांना अर्थव्यवस्थेचे घेणं देणं नाही, असा सणसणीत टोला राजन यांनी लगावला आहे.

देशाचा विकासदर घसरल्याच्या मुद्द्यावरुनही रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर टीका केली. ” लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर मोदी सरकारने राजकीय अजेंडा राबवण्यावर जास्त भर दिला. अर्थव्यवस्थेत येणाऱ्या समस्या सोडवण्याऐवजी सोशल अजेंड्याला जास्त महत्त्व दिलं. त्यामुळेच अर्थव्यवस्थेचा आलेख घसरला. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती दुर्दैवी आहे. केंद्र सरकारला फक्त राजकारणात रस आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्था ढासळण्यात होतो आहे. ” असंही रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

यावेळी रघुराम राजन यांनी म्हटले की, सध्याच्या सरकारने निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:चा राजकीय व सामाजिक अजेंडा पूर्ण करण्याला अधिक प्राधान्य दिले. अगोदरच नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) दोषपूर्ण अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. दुर्दैवाने, सरकारच्या या कार्यपद्धतीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग आणखीनच मंदावला, असे मत रघुराम राजन यांनी व्यक्त केले.

नुकत्याच जाहीर झालेल्या आकेडवारीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.७ टक्के इतका नोंदवण्यात आला. ही गेल्या सात वर्षांतील निच्चांकी कामगिरी आहे. मात्र, केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिव अतनू चक्रबर्ती यांनी आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा भरारी घेईल, असा दावा केला होता.

 

News English Summery: The current government in the country is trying to fulfill its social and political objectives rather than focusing on the economy. Former Indian Reserve Bank Governor Raghuram Rajan has said that the economy is in turmoil. If India still focuses on important issues, the Indian economy can take over. However, unfortunately in the last few years only politics seems to be happening, Raghuram Rajan said. He was speaking in an interview to Bloomberg English News. At this time he was asked about the disappointing performance of the Indian economy. Raghuram Rajan was asked about the factors which prevented this growth despite the potential for growth in the Indian economy.

 

Web News Title: Story Modi government has focused on political and social agenda than Economy says former RBI Governor Raghuram Rajan.

हॅशटॅग्स

#Reserve Bank of India(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x