25 April 2024 6:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

बिहारला वादळाचा तडाखा; वीज कोसळून तब्बल ८३ जणांचा मृत्यू

Bihar, lightning strikes, Storm

पाटणा, २५ जून : बिहारमध्ये गुरुवारी आलेल्या वादळाने राज्यात थैमान घातलं असून यात मोठी जीवितहानी झाली आहे. राज्यात विविध भागात वीज कोसळून तब्बल ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वाधिक १३ बळी हे गोपालगंज जिल्ह्यात गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या जीवितहानीमुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वादळात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

बिहारमध्ये गुरूवारी वादळामुळे प्रचंड जीवितहानी झाली आहे. वादळादरम्यान राज्यात ठिकठिकाणी विजा कोसळून तब्बल ८३ नागरिक मरण पावले आहेत. यात सर्वाधिक वीजबळी गोपालगंज जिल्ह्यात गेले आहेत. गोपालगंजमध्ये वीज कोसळून १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मधुबनी व नबादा जिल्ह्यात प्रत्येकी ८ लोक मरण पावले आहेत.

बिहारमधील आठ जिल्ह्यामध्ये ५ वीजबळी गेले आहेत. यात गोपालगंज, पूर्वी, चंपारण, सिवान, बांका, दरभंगा, भागलपूर, मधुबनी व नबादा यांचा समावेश आहे. मृतांच्या आकडा समोर आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. वीज कोसळून मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा नितीशकुमार यांनी केली आहे.

 

News English Summary: The storm that hit Bihar on Thursday has taken a heavy toll on the state. As many as 83 people have been killed in lightning strikes in various parts of the state. The highest number of 13 victims have gone to Gopalganj district.

News English Title: 83 people have been killed in lightning strikes in various parts of the Bihar state News latest Updates.

हॅशटॅग्स

#Bihar(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x