26 April 2024 1:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

लस निर्यात, कंट्रोल, पुरवठा आणि नियम करतात मोदी | तुटवड्याला ठाकरे, नेहरू जवाबदार

Congress , Srivatsa, corona vaccination

मुंबई, ९ एप्रिल: सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर राजेश टोपेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले होतं.

प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारने लसीकरणावरुन राजकारण करू नये असा टोला लगावला होता. तसेच राज्य सरकारला केंद्राने किती लशी पुरवल्या याचा आकडाही त्यांनी सांगितला होता. यासोबतच पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, महाराष्ट्रात 5 लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच योग्य प्रकारे केले जात नाही. एका वायलमध्ये 10 लोकांना डोस दिले जातात. त्याचं व्यवस्थित नियोजन करायला हवे. राज्य सरकार आपलं काम नीट करत नाही आणि दुसऱ्यांवर दोष देत आहे.’

यावर आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. राजेश टोपे म्हणाले होते की, ‘लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.’

आता यावरून काँग्रेसचे कर्नाटकातील नेते श्रीवत्स यांनी ट्विटरवरून मोदी सरकारला जोरदार टोला लगावला आहे. या संदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “लसींची निर्यात कोणी केली?.. मोदीजी, लस प्रक्रिया कोण नियंत्रित करतंय? मोदीजी… लस वितरण कोण नियंत्रित करतंय? मोदीजी… लस कोणाला मिळते यावर नियम कोण ठरवतंय? मोदीजी…. लसीच्या कमतरतेसाठी कोण जबाबदार आहे? उद्धव ठाकरे आणि जवाहरलाल नेहरू….संपूर्ण पॉलिटिकल सायन्स लॉजिक

 

News English Summary: Now, Congress leader from Karnataka Shrivats has taken to Twitter to lash out at the Modi government. In this context, while tweeting, he has said, “Who exported the vaccines? .. Modiji, who controls the vaccine process? Modiji … Who controls the vaccine distribution? Modiji … Who sets the rules on who gets the vaccine? Modiji .. .. Who is responsible for the lack of vaccines? Uddhav Thackeray and Jawaharlal Nehru

News English Title: Congress leader Srivatsa slams Modi govt over politics of corona vaccination news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x