24 April 2024 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
x

मोदींच्या सत्ताकाळात कोरोनामुळे तुमचा जीव वाचेल त्यालाच 'विकास' समजा - काँग्रेस

Congress leader Surendra Rajput

नवी दिल्ली, २८ एप्रिल | कोरोनाने गेल्या एक वर्षात दोन लाखांपेक्षा जास्त लोक आपल्यातून हिरावून घेतले. मंगळवारी देशात सर्वाधिक ३,२८५ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी आकडेवारीत २,०१,१६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. तथापि, खरे आकडे यापेक्षाही खूप जास्त आहेत. त्याचबरोबर देशात प्रथमच एका दिवसात २.६२ लाख लोकांनी कोरोनावर मात केली ही दिलासादायक बातमीही आली. आतापर्यंत १.४८ कोटी लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

दरम्यान, मंगळवारी ३,६२,७५७ नव्या रुग्णांसह एकूण रुग्णांचा आकडा १.७९ कोटींवर गेला. चिंतेची बाब म्हणजे बरे होण्याचा दर घसरून ८२.३% झाला आहे, हा दर याच वर्षी १७ फेब्रुवारीला ९७.३३ टक्के होता. भारतात कोरोनामुळे पहिला मृत्यू गेल्या वर्षी १२ मार्चला झाला होता. महामारीच्या दुसऱ्या लाटेत आकडे रोज नवा विक्रम घडवत आहेत. १० सर्वाधिक प्रभावित राज्यांतच एप्रिलमध्ये मृतांची संख्या ५ पट वाढली आहे. अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर आता भारत दोन लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेला चौथा देश आहे.

दरम्यान, देशातील इस्पितळं आणि स्मशानभूमीच्या बाहेरील स्थिती अत्यंत भयाण झाल्याचं पाहायला मिळतंय. लोकांपुढे जीव वाचवणं हेच ध्येय असल्याचं अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळतंय. या परिस्थितीमुळे सर्वत्र गंभीर वातावरण झालं असून त्याचे प्रतिबिंबं इस्पितळाबाहेरील आणि स्मशानभूमीबाहेरील लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळतंय. त्यालाच अनुसरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुरेंद्र राजपूत यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “मोदींच्या सत्ताकाळात कोरोनामुळे तुमचा जीव वाचेल त्यालाच ‘विकास’ समजा”.

 

News English Summary: Corona has deprived more than two million people of us in the last one year. The highest death toll in the country was 3,285 on Tuesday, with government figures showing 2,01,165 deaths due to corona. However, the real figures are much higher than this. At the same time, for the first time in the country, 2.62 lakh people overcame Corona in a single day. So far, 1.48 crore people have been cured of corona.

News English Title: Congress leader Surendra Rajput criticized Modi govt over situation created in India after corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x