19 April 2024 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

स्वच्छ भारत मिशन | देशातून खोटेपणाचा कचराही साफ करायला हवा - राहुल गांधी

Rahul Gandhi, PM Narendra Modi, Swachh Bharat Mission

नवी दिल्ली, ०९ ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या राममंदिराचा शिलान्यास केल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यातच शनिवारी मोदींनी आणखी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे, जी देशाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.

मोदींनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्र यांच आज उद्घाटन केलं. त्यांनी हे सेंटर महात्मा गांधी यांना समर्पित केलं आहे. पीएम मोदींनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची (आरएसके) सर्वात पहिली घोषणा 10 एप्रिल 2017 रोजी गांधीच्या चंपारण्य ‘सत्याग्रहा’ला 100 वर्षे पुर्ण झाल्याच्या दिवशी केली होती. या केंद्रात भावी पिढीला स्वच्छ भारत मिशनच्या प्रवासाबाबत माहिती दिली. गंगा नदीप्रमाणे देशातील इतर नद्याही प्रदूषणमुक्त करायच्या आहेत, असं मोदींनी सांगितले. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी महात्मा गांधींच्या कामाचा आदर्श घेण्याचं आवाहन केलं. स्वच्छता हे गांधींच्या आंदोलनाचं मोठं माध्यम होतं, असंही ते यावेळी म्हणाले होते.

“भारत छोडोचे हे सर्व संकल्प स्वराज्यपासून सुराज्याच्या भावनेला अनुरुपच आहेत. याच अनुशगांने आज आपल्या सर्वांना ‘गंदगी भारत छोड़ो’ चा संकल्प देखील पुन्हा करायचा आहे. या आजपासून १५ ऑगस्टपर्यंत म्हणजे स्वतंत्रता दिवसापर्यंत देशात एक आठवडा मोठे अभियान राबवूयात.” असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी अस्वच्छतेला देशातून हद्दपार करण्यासाठी ‘भारत छोडो’चा यावेळी नारा दिला.

दरम्यान, चीनकडून कथित सीमा उल्लंघन प्रकरणाचं वादळ काही काळ शांत झालेलं असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं की, “आपल्याला आता खोटेपणाचा कचरा देखील देशातून साफ करायला हवा.”

पीएमओनं नुकतचं ट्विट करुन कचरामुक्त भारत मिशनमध्ये सामिल होण्याचे आवाहन जनतेला केले होते. या ट्विटवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, “का नाही? आपल्याला आणखी एक पाऊल पुढे टाकून देशातील खोटेपणाचा कचरा देखील साफ करायला हवा. यासाठी पंतप्रधान आता चीनने आपल्या जमिनीवर कब्ज केलाय की नाही ते सांगून हा सत्याग्रह सुरु करतील का?”

 

News English Summary: Congress leader Rahul Gandhi has once again targeted Prime Minister Narendra Modi over this. Referring to the Central Government’s Swachh Bharat Mission, he said that we should now also clean up the garbage of lies from the country.

News English Title: Lets Clean Garbage Of Falsehood As Well Rahul Gandhi Attacks Pm Modi On Swachh Bharat Mission News Latest updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x