20 April 2024 1:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मीडियाला अंबानीच्या जीवाची काळजी | शेतकरी प्रश्नांवर मीडिया चर्चा केव्हा घेणार? - भाई जगताप

Mumbai congress, MLA Bhai Jagtap, Farmers Protest, Ambani scorpio case

मुंबई, २० मार्च: मागील १०० दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनात आज पर्यंत शेकडो शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. मात्र त्यासंदर्भात केंद्र सरकारकडून कोणताही खेद किंवा गरजेचं पाऊल टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील केंद्र सरकार विरोधात रोष वाढताना दिसत आहे.

दुसरीकडे देशभरात कोरोना लसीकरण सुरु असून त्याचा लाभ देशातील वरिष्ठ नेते मंडळी देखील घेताना दिसत आहेत. या पार्श्वभूमी शेतकरी आंदोलकांचे नेते आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आंदोलक शेतकऱ्यांना कोरोना लस देण्याची मागणी केली आहे. आंदोलन स्थळावर असलेल्या शेतकऱ्यांना कोरोनाची लस देण्यात यावी. मीही कोरोना लस घेईन, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

मात्र केंद्र सरकार आणि प्रसार माध्यमांकडून याबद्दल कोणतीही वाच्यता होताना दिसत नाही तसेच. तसेच याबद्दल सरकारला काही प्रश्न विचारण्याचा त्रास देखील माध्यमं घेताना दिसत नाहीत. दुसरीकडे मुकेश अंबानींच्या घराजवळील स्कॉर्पिओ प्रकरणानंतर प्रसार माध्यमांना पूर्णवेळ कार्यक्रम मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यालाच अनुसरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सरकार आणि माध्यमांना देखील सुनावलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना भाई जगताप यांनी म्हटलं आहे की, “२५० शेतकरी आंदोलनात शहीद, पण मीडियाला अंबानीच्या जीवाची काळजी…शेतकरी प्रश्नांवर मीडिया चर्चा केव्हा घेणार..??

 

News English Summary: For the last 100 days, farmers have been protesting against the Agriculture Act on the borders of Delhi. Hundreds of farmers have lost their lives in this agitation till date. However, no regrets or necessary steps have been taken by the central government in this regard. As a result, there is growing anger among the farmers against the central government.

News English Title: Mumbai congress president Bhai Jagtap criticised Media too over stand on Ambani scorpio case news updates.

हॅशटॅग्स

#BhaiJagtap(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x