महत्वाच्या बातम्या
-
हम तो फकीर आदमी है म्हणणाऱ्या मोदींच्या मंत्रिमंडळात ९१ टक्के मंत्री करोडपती
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. गुरुवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर काल लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांचं रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच कायम ठेवण्यात आले आहे. मोदींच्या कॅबिनेटमधील एकूण ५६ मंत्र्यांपैकी ५१ मंत्री हे करोडपती आहे. त्यापैकी एकूण २२ जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्योगपतींना मोठ्या सवलती देणाऱ्या मोदी सरकाकडून शहीदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत फक्त रु.५०० ने वाढ
मोदी सरकार उद्योगपतींची जेवढे धडाडीचे निर्णय घेताना दिसते तसे निर्णय इतर विषयात खुल्या हाताने घेताना दिसत नाही. मात्र जेव्हा विषय शेतकरी आणि इतर राबणाऱ्या हातांचा येतो तेव्हा तुटपुंज्या वाढ करून स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते. तसाच प्रकार पुन्हा घडला आहे आणि अगदी त्या निर्णयावर सही करताना स्वतःचा व्हिडिओ टाकायला देखील मोदी विसरले नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है! भारताचा GDP ७.२ टक्क्यांवरून घसरून ६.८ टक्क्यांवर
भारताच्या जीडीपी वाढीच्या दरात मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा घसरण झाल्याचे समोर आलं आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ७.२ टक्क्यांवर असणारा जीडीपी दर २०१८ -२०१९ या आर्थिक वर्षात ६.८ टक्क्यांवर घसरला आहे. शेती आणि निर्मिती क्षेत्रातील खराब प्रदर्शनाचा जीडीपाला फटका बसला असल्याची अधिकृत माहिती शुक्रवारी देण्यात आली आहे. दरम्यान २०१८-१९ च्या जानेवारी-मार्चच्या पहिल्या तिमाहीत तर जीडीपी दर ६ टक्क्यांपर्यंत खाली होता. जो की मागिल वर्षात याच तिमाहीत ८.१ टक्क्यांवर होता. या वर्षात वाढीचा दर ५.८ टक्क्यांपर्यंत आला असल्याचे केंद्राने दिलेल्या आकडेवारीत दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
लाव रे ती फुसकी लवंगी! सेनेच्या वाट्याला पुन्हा अवजड उद्योग खातं आल्याने समाज माध्यमांवर खिल्ली
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अवजड मालिका! सेनेच्या वाट्याला पुन्हा सामान्यांशी काहीच संबंध नसलेलं अवजड उद्योग खातं
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान पदानंतरचं गृह खातं अमित शहांकडे; तर राजनाथ सिंह संरक्षण मंत्री
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे. शिवसेनेच्या वाट्याला नेहमीप्रमाणेच अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद आले असून रावसाहेब दानवे यांना ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शहांना संरक्षण खातं दिलं तर पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल: उद्धव ठाकरे
काल नरेंद्र मोदी यांच्या बहुमतातील सरकारचा दिल्लीत शपथविधी समारोह पार पडला. त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीय मधून मोदींवर पुन्हा स्थुतीसुमनांचा पाऊस पडला आहे. सामनात उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, ‘देशाबरोबर जगाच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत, मोदींचे सरकार त्या दिशेने गरुडझेप घेईल अशी आशा बाळगायला हरकत नाही, मोदी-२ सरकारचा चेहरा मोदी हाच आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून निक्षून सांगितलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मोहरे काय करतात ते पाहायचे. नाहीतर अमित शहा यांचा चाबूक तेथे आहेच. अमित शहा यांच्या येण्याने नरेंद्र मोदी सरकारला बळ मिळेल असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिपद मिळालं, 'लाव रे फटाके'! भाजपासाठी आठवले व उद्धव ठाकरेंची राजकीय किंमत एकच?
कालच नवी दिल्लीत मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि त्यात अनेक पक्षातील खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यात भाजप सरकार बहुमताने सत्तेत आल्यामुळे एनडीएच्या घटक पक्षांचे चोचले पुरवले जाणार नाहीत हे त्या घटक पक्षांना आधीच ठाऊक असावं. त्यात मागील ५ वर्ष सत्तेला लाथ मारणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे गोडवे गाताना दिसत आहेत, मात्र त्यांच्याकडे १८ खासदार असले तरी ते मोदींच्या नावावरच निवडून आले आहेत, हे सत्य असलं तरी ते मान्य करणार नाहीत हे वास्तव आहे. अर्थात शिवसेनेचा संपूर्ण प्रचार हा मोदींच्या नावावर झाला, त्यात गरजेप्रमाणे स्वर्गीय. बाळासाहेबांना देखील लक्षात ठेवण्याचा त्रास यांच्या स्टार प्रचारकांनी घेतला नाही हे सर्वांनी डोळ्याने पहिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शपथविधी दिवशीच दिल्ली भाजपाची वेबसाईट हॅक, बीफ डिशची पोस्ट
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यात एकूण २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान एकीकडे राष्ट्रपती भवनात शपथविधीचा शाही कार्यक्रम सुरु असताना दुसऱ्याबाजूला दिल्ली भारतीय जनता पक्षाची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. यावेळी हॅकर्सनी वेबसाईटच्या होमपेजवर गोमांस म्हणजेच बीफ रेसिपी पोस्ट केली. या रेसिपीसोबत Hacked by ‘Shadow_V1P3R’ असा मेसेजही लिहिण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
आठवलेंना पुन्हा मंत्रिपदाची शपथ; मागील ५ वर्ष त्यांनी काय विकास कामं केली ते रहस्य
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ६५ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये आधीच्या २१ मंत्र्यांना नारळ देण्यात येणार असून २० तरी नवीन चेहरे असण्याची शक्यता आहे. मात्र, रामदास आठवले मंत्रिपदासाठी शहांच्या फोनची वाट पाहत होते. अखेर आठवलेंना शहांचा फोन आला असून अद्याप मंत्रीपदाबाबत माहिती समोर आलेली नाही. याआधी देखील त्यांना मंत्रिपद भेटलं असलं तरी त्यांच्याकडे असलेल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी नेमकी कोणती विकास कामं केली हा मुळात संशोधनाचा विषय आहे. मागील ५ वर्ष ते प्रसार माध्यमांना केवळ फुटकळ प्रतिक्रिया देणं आणि संसदेत किंवा संसदेच्या बाहेर श्रोत्यांना मनावर दगड ठेवून ऐकाव्या लागणाऱ्या शेरोशायऱ्या दिल्याचे मतदाराला ज्ञात आहे. त्यामुळे पुढील ५ वर्ष देखील ते वेगळं काही करणार नाहीत अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आंध्र प्रदेश: जगनमोहन रेड्डींच्या शपथविधीवर निसर्गाची वक्रदृष्टी
आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसला ऐतिहासिक आणि स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचा सुपडा साफ झाला. दरम्यान पक्ष प्रमुख जगनमोहन रेड्डी आज मुख्यमंत्रपदाची शपथ घेणार होते. कार्यक्रम स्थळावर जोरदार तयारीही करण्यात आली होती. परंतु, बुधवारी रात्री आलेल्या जोरदार वादळ आणि पावसामध्ये कार्यक्रम स्थळच उद्ध्वस्त झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी पुन्हा देशाचे नेतृत्व करणे ही ईश्वरी योजनाच : उद्धव ठाकरे
लोकसभा निवडणुकीत बहुमताने मिळालेल्या दणदणीत विजयानंतर नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधापदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील त्यांचा शाही शपथ सोहळा हा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच आहे अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामना संपादकीयच्या माध्यमातून मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. देशासमोर अनेक प्रश्न असू शकतात. नव्हे, ते आहेतच, पण त्या प्रश्नांचा डोंगर हिमतीच्या वज्रमुठीने फोडण्याचे साहस पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या छातीत व मनगटात आहे. मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्याचे हेच महत्त्व आहे. मोदी यांनी देशाच्या जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे. ते कालपर्यंत प्रधानसेवक होते, चौकीदार होते. आज पालक बनले आहेत. त्यांचा आधार वाटावा, विश्वास वाटावा असे वातावरण निर्माण झाले व तोच त्यांच्या विजयाचा राजमार्ग ठरला असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना खासदार अरविंद सावंत घेणार केंद्रीय मंत्रीपदाची शपथ
काँग्रेसचे देशभर सुपडा साफ करून भाजपने बहुमताने विजय प्राप्त केला आणि त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेणार हे अधोरेखित झाले. दरम्यान आज राष्ट्रपती भवनात सांयकाळी ७ वाजता शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी काही खासदांराना केंद्रीय मंत्री म्हणूनही शपथ देण्यात येणार आहे. यामध्ये शिवसेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांचादेखील समावेश असल्याचे वृत्त आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शपथविधीसाठी अरविंद सावंत भल्या पहाटे आपल्या कुटुंबासह दिल्लीला रवाना झाले आहेत. तसेच शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासहित उपस्थित राहणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! ४ राज्यात अनेक जागांवर एकूण मतदानापेक्षा जास्त मतं आढळली: न्यूज क्लिकचा रिपोर्ट
लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. त्यातील अजून एक मतमोजणी बाबतचा खुलासा म्हणजे देशातील एकूण ४ राज्यांमधील अनेक मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानाच्या आकड्यापेक्षा हजारोने मतं मतमोजणीत अधिक मिळावी आहेत. म्हणजे संबंधित लोकसभा मतदासंघ आणि तिथे जाहीर झालेली एकूण मतांची आकडी आणि प्रत्यक्ष मतमोजणीत जाहीर झालेला एकदा एकूण मतांचा आकडा हजारोने अधिक आहे. त्यामुळे सर्वांचं आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि तास रिपोर्ट न्यूज क्लिकने प्रत्यक्ष तपासाअंती दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम! थोड्याच वेळात बैठक
लोकसभा निवडणुकीतील देशभरात झालेल्या दारूण पराभवानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला वारंवार राहुल गांधी राजीनामा देणार नाहीत असे सांगत आहेत. दरम्यान, आज सायंकाळी ४:३० वाजता राहुल गांधींनी आपल्या घरी पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय चर्चा होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर; मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक असलेल्या ५०% जागा भाजपने जिंकल्याने आश्चर्य
नुकत्याच पार पडलेल्या आणि निकालाअंती मोठं यश प्राप्त करणाऱ्या भाजपच्या विजयासंदर्भात आता धक्कादायक आकडेवारी समोर येते आहे. २०१४ मधील मोदी लाटांचा विचार केल्यास यंदा मोदी लाट नसताना देखील एकट्या भाजपने तब्बल ३०३ जागा तर भाजपप्रणीत एनडीएने एकूण ३५३ जागांवर घवघवीत यश प्राप्त केलं आहे. त्यात सर्वात महत्वाची आणि धक्कादायक गोष्ट समोर येते आहे आणि ती म्हणजे भाजपने मोठ्या प्रमाणावर म्हणजे २५ टक्क्यांहून अधिक अल्पसंख्यांक असलेल्या तब्बल ५०% जागा जिंकल्या आहेत आणि त्यादेखील हिंदुत्वाचा मुद्दा रेटून.
5 वर्षांपूर्वी -
मोदींचा चमत्कारी विजय ही भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत चिंतेची बाब: द वॉशिंग्टन पोस्ट
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात मोदी लाट नसताना देखील प्रत्यक्षात मोदी त्सुनामी आली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मोदींच्या या यशानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तसेच लोकांमध्ये सुद्धा आता २-३ दिवसानंतर वेगळीच चर्चा चौकाचौकात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने या संदर्भात एक लेख प्रसिद्ध केला आहे. भारतासारख्या विशाल लोकशाहीत मोदींचा आश्चर्यकारक विजय अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे.
5 वर्षांपूर्वी -
गावं-शहरांतील चौकांमध्ये गप्पा रंगल्या 'यांना मतं नक्की दिली तरी कोणी?'
देशभरात रोजगार आणि महागाईसारख्या प्रमुख विषयांवरून भाजप आणि मोदी विरोधी वातावरण असताना स्वतः भाजप देखील बहुमताने सत्तेत येईल का या भीतीने ग्रासली होती. समाज माध्यमांवर मोदी किंवा भाजप संबंधित येणाऱ्या बातम्यांवर नेटिझन्स देखील तुफान टीकेची झोड उठवताना दिसत होते. त्या प्रतिकऱ्यांमध्ये भाजप किंवा मोदींच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया शोधून देखील सापडणं कठीण होतं. मात्र मोदी लाट तर सोडा, प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी मोदी त्सुनामी आली अनेकजण बुचकळ्यात पडल्याचे चित्र आहे.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! मुस्लिम तरुणाची टोपी काढली व जय श्रीराम बोलण्यास सांगून जबर मारहाण
येथे काही अज्ञात तरुणांनी एका २५ वर्षीय मुस्लिम युवकाला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने पारंपारिक टोपी घातली असल्याने ही मारहाण करण्यात आल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मोहम्मद बरकत आलम असं या तरुणाचं नाव असून तो मुळचा बिहारचा आहे. गुरुग्राम येथील जकोब पुरा परिसरात तो राहतो.
5 वर्षांपूर्वी -
मोदी लाट नसताना 'मोदी-त्सुनामी' आली आणि या बातम्या समाज माध्यमांवर व्हायरल
देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशभरात मोदी त्सुनामी आल्याचे दिसले. त्यात अनेकांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त करत वेगळीच शंका व्यक्त केली होती. दरम्यान अनेकांनी देशात मोदी लाट नक्कीच नव्हती असं जाहीर पणे म्हटलं आणि अनेक भाजप नेत्यांनी देखील ते पडद्याआड मान्य केलं. विशेष म्हणजे मुस्लिम बहुबल भागात देखील भाजपच्या उमेदवारांना भरभरून मतं पडल्याने त्यात शंका अधिक दुणावल्याचे पाहायला मिळाले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल
- Govt Employees Salary | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि ईपीएफ मर्यादा वाढणार, महत्वाची अपडेट आली
- Numerology Horoscope | 13 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल