26 April 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

शिक्षण आणि श्रीमंतीमुळे उद्धटपणा येतो आणि घटस्फोट होतात: मोहन भागवत

RSS, Mohan Bhagwat, Education and Welath, divorce

मुंबई : शिक्षण आणि श्रीमंतीमुळे उद्धटपणा येतो आणि त्यामुळे घटस्फोट होतात असं अजब तर्कट सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडलंय. घटस्फोटांचं प्रमाण हे सुशिक्षित आणि श्रीमंत कुटुंबात अधिक आहे असं भागवत म्हणालेत. हिंदू समाज व्यवस्थेला पर्याय नाही असा दावा त्यांनी केला. मात्र त्याचवेळी महिला सबलीकरणावर भर देताना महिलांना घरात डांबून ठेवण्याला त्यांनी कडाडून विरोध केला.

महिलांना घराबाहेर पडू न दिल्यामुळे समाजाची दूरवस्था झाली असल्याचा दावा त्यांनी केलाय. २००० वर्षांपूर्वी ही स्थिती नव्हती. महिलांना स्वातंत्र्य होतं. तो आपल्या समाजव्यवस्थेचा सुवर्णकाळ होता असंही भागवत म्हणाले.

२ हजार वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचं पालन करत असल्यानंच समाजात अशी परिस्थिती आहे. आपण महिलांना घरांपर्यंत मर्यादित ठेवलं आहे. अशी स्थिती २ हजार वर्षांपूर्वी नव्हती. तो आपल्या समाजाचा सुवर्ण काळ आहे. हिंदू समाजानं सदगुणी आणि संघटित झालं पाहिजे. जेव्हा मी समाजासंदर्भात बोलतो तेव्हा फक्त ते पुरुषांसाठी नसतं. मी हिंदू आहे. मी सर्वच धर्मांच्या पवित्र स्थानांचा सन्मान करतो. परंतु मी आपल्या श्रद्धेच्या स्थानाप्रति कटिबद्ध आहे. मला हे संस्कार माझ्या कुटुंबीयांकडून मिळाले आहेत.

मोहन भागवत काय म्हणाले होते?
‘घटस्फोटाची प्रकरणे आजकाल मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. किरकोळ कारणांवरुन जोडपी भांडतात. सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे अधिक आढळतात, कारण शिक्षण आणि संपन्नतेसोबत अहंकारही येतो. त्यामुळे कुटुंबं विभक्त होतात. समाजही विभाजित होतो, कारण समाज हेही एक कुटुंब आहे’, अशी भूमिका मोहन भागवत यांनी मांडल्याचं संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत रविवारी संघाच्या कार्यकर्त्यांना अहमदाबादमध्ये संबोधत होते.

 

Web Title: Story due to education and wealth arrogance leads to increasing ratio of divorce says RSS Chief Mohan Bhagwat.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x