पंपाने नव्हे तर 'घुशींनी पोखरल्याने साचलेलं पाणी समुद्रात गेलं; नेटकऱ्यांकडून सरकारची खिल्ली
चिपळूण : तिवरे धरण फुटल्यानंतर अनेकांनी आपला जीव गमावला असून सरकारच्या निष्काळजीपणावर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान गावकऱ्यांनी सरकारला आधीच याबाबत कल्पना दिली होती आणि तरी देखील सरकारी यंत्रणेने त्यावर पूर्णपणे डोळेझाक केली होती. प्रसार माध्यमांनी देखील सरकारला एका दिवसापुरता फैलावर घेतल्याचे दिसत असून आगमी विधानसभा निवडणुका हे त्यामागील कारण असावे असं म्हटलं जातं आहे.
दरम्यान सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले असले तरी त्या धरणाचं बांधकाम शिवसेनेच्या कॉन्ट्रॅक्टर आमदाराच्या कंपनीनेच केले होते हे उघड झाले आहे. त्यामुळे त्याच्या बचावासाठी त्या धरणाच्या अपघाती भागात दौऱ्यावर जाणारे सत्ताधारी नेते गावकऱ्यांनी दिलेल्या कारणांचा वेगळाच संदर्भ जोडून मूळ घटनेपासून स्वतःला क्लीनचित देण्याची योजना आखात आहे असंच म्हणावं लागेल.
खेकड्यांनी भोकं पाडल्याने जे भगदाड पडलं त्यामुळेच तिवरे धरण फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही एक दुर्घटना होती. अधिकाऱ्यांशी आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांशी मी चर्चा केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. वास्तविक हे तेच मंत्री आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी मी महाराष्ट्राला भिकेला लावेन असं वक्तव्य केलं होते आणि सेनेने त्यांना मंत्रिपद दिलं. त्यामुळे त्यांच्याकडून असेच निष्कर्ष येणं अपेक्षित आहे.
चिपळूणमधलं तिवरे धरण फुटल्याने २३ जण वाहून गेले त्यापैकी १८ मृतदेह हाती लागले आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून शोध कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे. अशात जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचं अजब तर्कट समोर आलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला संताप आणणारं हे वक्तव्य आहे. खेकड्यांनी धरण फोडलं असेल तर गुन्हा कुणावर दाखल करायचा असाही प्रश्न सावंत यांनी विचारला आहे. २००० साली हे धरण बांधून पूर्ण झालं. मागच्या १५-१६ वर्षांपासून या धरणात पाणी साठत होतं. जेव्हा धरण गळू लागलं तेव्हा तक्रार करण्यात आली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अशात आता जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी मात्र खेकड्यांनी भोकं पाडल्याने तिवरे धरण फुटलं असा अजब दावा केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अजब दावा केला आहे. तिवरे धरण फुटल्याने शेजारच्या सहा ते सात गावांना या दुर्घटनेचा फटका बसला आहे.
मात्र मंत्री महाशयांच्या या विधानावरून नेटिझन्सनी मात्र समाज माध्यमांवर सरकारला झोडपून काढल्याचे पाहायला मिळत आहे. कारण देण्यात सरकार चलाख असल्याने नेटिझन्सनी त्यांची चलाखी त्याच्यावरच उलटलेली आहे. जर संधारणासारखा भव्य विषय खेकड्यांमुळे नेस्तनाबूत होऊ शकतो आणि खेकड्यांनी धरण पोखरल्याने ते फुटू शकतं, तर सत्तेत असलेली शिवसेना मुंबईकरांना मुंबई पावसाळ्यात तुंबल्यावर कारणं देत पालिकेने केलेल्या अत्याधुनिक पंपामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने पाणी समुद्रत सोडून दिल्याने शहरावरचं संकट टळलं असं सांगत असते. मात्र हीच मुंबई महानगर पालिका शहरातील उंदरांच्या बंदोबस्तासाठी अनेक टेंडर काढत असते, मात्र उंदीर अजून तसेच आहेत. मग उद्या मुंबईकरांनी पालिका प्रशासनाला त्याच्या प्रतिक्रियेवर असं उत्तर दिलं की ‘घुशींनी पोखरल्याने साचलेलं पाणी समुद्रात गेलं’ तर वावगं ठरणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
- Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Lotus Chocolate Share Price | मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 महिन्यात 43 टक्के परतावा दिला
- Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली
- Numerology Horoscope | 15 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल