25 April 2024 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

बॅलेट पेपरने निवडणुकीचा निकाल काय लागतो ते दिसलं | काश EVM होता तो

Minister Hasan Mushrif, BJP, MLC election result

कोल्हापूर, ४ डिसेंबर: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपुर पदवीधर या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विजय झालेला पाहायला मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपणच विजयी होणार असा केलेला दावा फोल ठरलेला दिसत आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif reaction after MLC Election Result in favor of MahaVikas Aghadi government) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना हा दावा फेटाळून लावला आहे. राज्यात तीन पक्ष एकत्र आल्यावर काय होऊ शकतं हे या निवडणुकीतून दिसून आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) मुंबईत राहू लागल्यापासून त्यांचं नागपूरकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळेच नागपूरचे एक एक गड त्यांच्या हातून निसटून जात आहे, अशी खोचक टीका मुश्रीफ यांनी केली.

बॅलेट पेपर (Vote counting on ballet paper) असल्यावर निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो हे या निवडणुकीने दाखवून दिलं आहे. ईव्हीएम नसल्यामुळेच महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याचं जनतेचं मत झालं आहे. आपलं मत सार्थकी लागल्याची भावनाही जनतेमध्ये निर्माण झाली आहे, असं सांगतानाच आता फडणवीस आणि चंद्रकांतदादाही काश, ईव्हीएम होता तो अच्छा होता, असं म्हणत असतील, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

या निवडणुकीत आघाडीला यश मिळावं म्हणून तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतले. ही निवडणूक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखी झाली. या आधी या निवडणुका कधी पक्ष पातळीवर झाल्या नव्हत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या निवडणुकांमध्ये पूर्वी कधीच इतकं लक्ष घातलं नव्हतं. यावेळी दोन्ही पक्षांनी मतदार नोंदणीपासूनच लक्ष घालायला सुरुवात केली होती, असं ते म्हणाले.

 

News English Summary: This election has shown what the result of the election can be if there is a ballot paper (Vote counting on ballot paper). Due to the absence of EVM, the people have come to believe that the Mahavikas Aghadi has achieved great success. While saying that the people have a feeling that their opinion is meaningful, now Fadnavis and Chandrakantdada are also saying that Kash, EVM was good, minister Hasan Mushrif criticized.

News English Title: Minister Hasan Mushrif slams BJP after MLC election result news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x