महत्वाच्या बातम्या
-
मोदी देतील त्या दराने शेतमाल खरेदी करा | असे फडणवीसांनी शेतकऱ्यांना सांगावे
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी विधेयकावरून मोदी, फडणवीस व खोत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, कृषी विधेयकावरून देशभरातील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. काल मुंबईत मध्यरात्री संचारबंदी लागणार हे माहित असतानाही पंधरा हजारांवर शेतकरी उद्योगपती अंबानीच्या कार्यालयावरील मोर्चात सहभागी झाले होते. टाळेबंदी काळामध्ये अंबानी-अदानी या उद्योगपतींना मोठा तोटा झाला आहे. तो भरून काढण्यासाठी त्यांना अन्नधान्याच्या बाजारामध्ये केंद्र शासन उतरवत आहे.
3 वर्षांपूर्वी -
खडसे काय थांबेना | भाजपचे विद्यमान आमदार आणि दोन मोठे नेते लवकरच राष्ट्रवादीत
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठी गळती लागली आहे. आता भाजपला आणखी एक बसण्याची दाट शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आणि दोन मोठे नेते लवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (BJP MLA from Khandesh will soon join NCP party through Eknath Khadse)
3 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये भाजपाला मोठं खिंडार पडणार | शिवसेना धक्का देण्याचा तयारीत
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदा होऊ शकत असल्याने भारतीय जनता पक्षानेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आणि त्यांना प्रवेश दिला. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भारतीय जनता पक्षामधील या गटाकडून विचारला जात आहे. पण सानपांच्या पक्षप्रवेशानंतर आता भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अनेक नाराज नगरसेवक भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
काँग्रेसकडून लोटसचं ऑपरेशन | नगरमध्ये मोठे भाजप पदाधिकारी काँग्रेसमध्ये
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान, तत्कालीन सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचा लोंढा होता. मात्र हा लोंढा आता उलट दिशेने वाहण्यास सुरुवात झाली आहे. चक्क भाजपमधील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत नगरमधील अकोले इथं हा ‘चमत्कार’ घडला आहे. संगमनेर आणि अकोले इथल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
3 वर्षांपूर्वी -
SSC-HSC Exam Result | दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या
महाराष्ट्र राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (२३ डिसेंबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
3 वर्षांपूर्वी -
SSC Exam | ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर
एस एस सीच्या परीक्षांसाठी २०२१ करता ऑनलाईन पध्द्तीने अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी www. Mahahsscborad.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करायचे आहेत. नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २३ डिसेंबर ते ११ जानेवारी पर्यंतची मुदत आहे. तर खासगी विद्यार्थी आणि पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांना १२ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत. तर विद्यार्थ्यांचे अर्ज इतके घाईगडबडीत दाखल करून घेण्यावरून मुंबई मुख्याध्यापक संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. (SSC Board Exam 2021 online form date declared my Maharashtra SSC board)
3 वर्षांपूर्वी -
सानप यांच्या येण्याने शिवसेनेला काहीच फायदा झाला नव्हता | मग नुकसानीचा प्रश्नच कुठे
शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात घरवापसी करणाऱ्या बाळासाहेब सानप (Former MLA Balasaheb Sanap) यांचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक शैलीत समाचार घेतला. बाळासाहेब सानप यांच्या जाण्यामुळे शिवसेनेचे नुकसान झाले का, असे संजय राऊत यांना विचारण्यात आले. त्यावर संजय राऊत यांनी तितक्याच हजरजबाबीपणे उत्तर देत बाळासाहेब सानप यांनी खिल्ली उडविली. बाळासाहेब सानप यांच्या येण्याने शिवसेनेला कोणताही फायदा झाला नव्हता. त्यामुळे नुकसानीचा प्रश्नच नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
3 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यांकडून पुन्हा तीच चूक | सानप यांच्या प्रवेशाने अनेक नगरसेवक पक्ष सोडण्याचा तयारीत
नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Former Nashik MLA Balasaheb Sanap) यांनी शिवसेनेला धक्का देत पुन्हा भारतीय जनता पक्षाचा हात धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत सानप यांनी मुंबईत भारतीय जनता पक्ष प्रवेश केला. “महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्यामुळे पक्षात बाहेरील नेत्यांचे आगमन होणार असल्यांच्या पुंग्या सोडल्या जात आहेत. मात्र वेगवेगळ्या पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.
3 वर्षांपूर्वी -
अण्णा दिल्लीत जाऊन कृषी कायद्यांविरोधात आंदोलनच्या तयारीत | भाजप नेत्यांची धावाधाव
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाचा आजचा (२२ डिसेंबर) २७ वा दिवस आहे. मात्र, थंडीचा जोरात मार बसत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. आंदोलना दरम्यान ३३ शेतकऱ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे आणि अन्य काही मार्ग अडवलेत. विविध सीमेवर शेतकऱ्यांनी २४ तासांचे उपवास सुरू केले आहे. उपवासाची श्रृंखला आंदोलन असेपर्यंत ठेवली जाणार आहे. सोनीपथ येथे कुंडली सीमेवर आज ६५ वर्षीय निरंजन सिंह या शेतकऱ्याने विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
बच्चू कडूंच्या नेतृत्वात मुंबईतील रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा | पण त्याआधीच...
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज मुंबईत रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पण बच्चू कडू यांना पोलिसांनी नागपुरातच रोखून धरलं आहे. महत्वाची बाब म्हणजे बच्चू कडू यांना वरिष्ठांच्या आदेशानुसारच अडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हा आदेश देणारे वरिष्ठ कोण? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
3 वर्षांपूर्वी -
राज्यात पालिका क्षेत्रांत उद्यापासून रात्रीची संचारबंदी | मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील.
3 वर्षांपूर्वी -
दोन वर्षात तीन पक्ष | बुडत्याला काठीचा आधार? | भाजपने तिकटी नाकारलेले सानप पुन्हा भाजपमध्ये
नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी शिवसेनेला धक्का देत पुन्हा भाजपचा हात धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत सानप यांनी मुंबईत भाजपप्रवेश केला. “महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्यामुळे पक्षात बाहेरील नेत्यांचे आगमन होणार असल्यांच्या पुंग्या सोडल्या जात आहेत. मात्र वेगवेगळ्या पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.
3 वर्षांपूर्वी -
BHR Scam | गिरीश महाजणांविरुद्ध समर्थकांकडे पेनड्राईव्हमध्ये पुरावे | अडचणीत वाढ
बीएचआर पतसंस्था (BHR Society) अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीशी संबंधित कागदपत्रांनुसार जळगाव शहरातील खान्देश कॉप्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी सूरज सुनील झंवर व कैलास रामप्रसाद सोमाणी (Sunil Zanvar and Kailas Ramprasad Somani) यांच्या मालकीची आहे, असे एनसीपीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. दरम्यान, बीएचआर घोटाळा प्रकरणी सूरज यांचे वडील सुनील झंवर यांच्या ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकलेले होते. झंवर हे जळगावातील मोठे व्यावसायिक आहेत.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Updates | त्या तीनही पदभरतीसाठी आता एकच संयुक्त पूर्वपरीक्षा
कोरोना काळात एमपीएससी परीक्षा घेण्यावरून प्रचंड अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे त्यात अजून भर पडली आणि राज्य सरकारवर भरती पुढे ढकलण्याची वेळ आली होती. सध्या राज्य सरकारने जाहीर केली महाराष्ट्र पोलीस शिपाई पदाची भरती देखील प्रतीक्षेत आहे. एका बाजूला प्रचंड अडचणी असताना एमपीएससी बोर्ड सध्या उमेदवारांच्या भल्यासाठी परीक्षा प्रक्रियांमध्ये टप्याटप्याने काही सुसूत्रता आणत आहे. त्याबद्दलच एक महत्वाचा बदल समोर आला, ज्यामुळे एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
मेट्रो कारशेड | माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी - मुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोना परिस्थिती, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन, मुंबईसह राज्यात नाइट कर्फ्यू आणि लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याची आवश्यकता नाही, अशा विविध मुद्द्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना हात घातला.
3 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | ९ वर्षाच्या सावत्र मुलाला गरम तव्यावर उभं करून पायाला चटके
सध्या कौटुंबिक स्तरावरील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून त्यात लहान मुलांचे बळी जात आहेत. शुल्लक कारणांवरून घरातील जवाबदार आई-वडिलांसारखी व्यक्तीच टोकाचं पाऊल उचलू लागल्याने तो सामाजिक प्रश्न देखील होऊ लागला आहे.
3 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणूक | मुख्यमंत्र्यांची शिवसेना संपर्कप्रमुखांसोबत महत्वाची बैठक
महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर (Election Commission announces election program for 14 thousand 234 Gram Panchayat in Maharashtra) करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणूक | मोर्चेबांधणीसाठी स्वतः राज ठाकरे पुणे दौऱ्यावर
महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर (Election Commission announces election program for 14 thousand 234 Gram Panchayat in Maharashtra) करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
महापालिका निवडणुका | जागावाटपात अडचण आल्यास निकालानंतर एकत्र येऊ - भुजबळ
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे जागावाटप होईपर्यंत आघाडीतील प्रत्येक घटक पक्ष आपल्या पक्षाचा संघटनात्मक विस्तार करीत राहील. भारतीय जनता पक्षासह विविध पक्षांत नाराज आहेत. परंतु त्यांना प्रवेश देतांना वरिष्ठ पातळीवर निर्णयानंतरच त्याचा पक्षप्रवेशाचा निर्णय होईल. जागावाटपात अडचणी आल्यास स्वतंत्र निवडणूक लढता येईल. निवडणूक निकालानंतर देखील एकत्र येण्याचा पर्याय असेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
रामटेकमधील विकास कामांना पूर्वी पेक्षा दुप्पट निधी | भाजपचे माजी आमदार अजित पवारांवर खुश
रामटेक तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी मिळाल्याने, भाजपचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानलेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तिर्थक्षेत्राच्या विकासाला महाविकास आघाडी सरकारने 14 कोटी रुपये मंजूर केलाय. फडणवीस सरकारच्या काळात सात कोटी रुपये निधी देण्यात आला होता, पण नंतर निधी मिळाला नाही.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
- IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- Govt Employees Salary | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि ईपीएफ मर्यादा वाढणार, महत्वाची अपडेट आली
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार