20 April 2024 1:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मी पक्ष सोडला म्हणून थोरातांना संधी मिळाली, त्यांची कर्तबगारी काय? - विखे पाटील

Congress, Balasaheb Thorat, Radhakrushna Vikhe Patil

मुंबई, २० जून : राज्यात सत्ता स्थापन होऊन सहा महिने लोटले आहेत. राज्यात सत्तेत सहभागी असलेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. त्यावर लगेच पडद्या पडला. मात्र, यावरून भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. “स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार झाले असून, मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्ष पद मिळाले. त्यांची स्वतःची कर्तबगारी काय?”, अशी टीका विखे पाटील यांनी केली.

महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असलेल्या बातम्या सतत येत असतात. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही झाली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सारंकाही आलबेल असल्याचं थोरातांनी स्पष्ट केलं होतं. मात्र तरीही, काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या विखेपाटील यांनी बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेत्यांवर त्यांनी आरोप केले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे आरोप केले.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्षपद मिळालं. थोरातांची स्वतःची कर्तबगारी काय? थोरात म्हणजे दिशा हरवलेला माणूस आहे. गेल्या सहा महिन्यात त्यांनी अशी कोणती कर्तबगारी दाखवली. राज्यातील जनतेच्या प्रश्नासाठी बैठक होत नाही, तर आपापसातील वाद मिटवण्यासाठी बैठका होत आहे. काँग्रेसला इतकी लाचारी का करावी लागत आहे? स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार झाले आहेत. राज्यात काँग्रेसची वाताहत झाली आहे,” अशी टीका विखे पाटील यांनी केली.

शिवसेनेविषयी विखे पाटील यांनी भाष्य केलं. “राज्यात कोरोनासारखं मोठं संकट असताना राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. कोणताही निर्णय घेताना सरकारमधील तिन्ही पक्षात समन्वय नाही. राज्य सरकारच आज संभ्रमात आहे. मातोश्रीचा रिमोट आता शिवसेनेच्या हातात राहिलेला नाही. सत्तेच्या वाटमारीत शिवसेनेचं मोठं नुकसान होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही मोठी फरफट होताना दिसत आहे. त्यामुळे आता सत्तेत राहायचं की नाही याचा शिवसेनेनं विचार करण्याची वेळ आली आहे”, असंही विखे पाटील म्हणाले.

 

News English Summary: Discussions started a few days back that the ruling Congress party was unhappy with the state. Immediately the curtain fell on it. However, BJP leader Radhakrishna Vikhe Patil has targeted the Congress party. The Congress leaders are helpless for their own selfish ends and Balasaheb Thorat got the post of president as I left the party. What is their own duty? Such criticism was made by Vikhe Patil.

News English Title: The Congress leaders are helpless for their own selfish ends and Balasaheb Thorat got the post of president as I left the party News Latest updates.

हॅशटॅग्स

#Radhakrishna Vikhe Patil(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x