25 April 2024 8:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

राज ठाकरे खूपच स्पष्ट बोलतात | त्यांना स्पष्ट बोलण्याची सवय आहे

MNS Chief Raj Thackeray, Chandrakant Patil

मुंबई, २९ ऑक्टोबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एकहाती भगवा फडकला पाहिजे असे म्हटले. त्यावरुन चर्चांना सुरुवात झाली. यावर विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. पक्ष वाढवण्यासाठी भगवा एकहाती फडकवा असं बोलणं गैर नाही, सगळेच आपापला पक्ष वाढवत असतात. पण आम्ही प्रत्यक्षात ती कृती करून दाखवतो अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, शरद पवार घराबाहेर पडतात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

आजही राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले. यावरून शरद पवार हेच राज्य चालवतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलून काही उपयोग नाही, अशी खोचक टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली.

तसेच, उद्धव ठाकरे यांना राज्यातील प्रश्नांबाबत मी अनेकदा पत्रे लिहिली. पण त्यांनी माझ्या एकाही पत्राला उत्तर दिले नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. ठाकरे सरकार फार कुंथत कुंथत चालले असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावरील प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे खूपच स्पष्ट बोलतात. त्यांना स्पष्ट बोलण्याची सवय आहे.

 

News English Summary: I often wrote letters to Uddhav Thackeray regarding issues in the state. But they did not reply to any of my letters, said Chandrakant Patil. Raj Thackeray had criticized the Thackeray government for being very slow. Answering the question, Chandrakant Patil said, Raj Thackeray speaks very clearly. They have a habit of speaking clearly.

News English Title: MNS Chief Raj Thackeray always talked straight forward said Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x