19 April 2024 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील
x

थेट निवडणुका जिंकणं कठीण झाल्याने भाजप कर्नाटकात पुन्हा घोडेबाजार करणार?

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सत्तास्थापनेवेळी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार पाहायला मिळाला होता. दरम्यान, कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यानं येडीयुरप्पा यांनी सरकार स्थापन केलं होत. परंतु, बहुमत सिद्ध करता येणे शक्य नसल्याचे कळताच केवळ दीड दिवसांतच येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते.

तर दुसरीकडे सर्वात कमी जागा असून सुद्धा जेडीएसच्या कुमारस्वामी यांच्या नशिबी मुख्यमंत्रीपद आलं होतं. परंतु, आता पुन्हा कर्नाटकमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या फेरबदलानंतरच या सर्व हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. कारण मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने नाराज होणाऱ्या काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांना गळाला लावून सरकार पाडण्याचे प्रकार होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार उमेश कट्टी यांच्या एका विधानामुळे कर्नाटकमधील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला आहे. आमदार कट्टी यांनी विधान केलं होतं की, काँग्रेस-जेडीएस पक्षातील एकूण १५ नाराज आमदारांच्या मी थेट संपर्कात आहे. जर, ते तिथे नाराज असतील आणि भाजपात येऊ इच्छित असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे कट्टी यांनी म्हटले. त्यानंतर याचर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. उमेश कट्टी हे कट्टर भाजपा समर्थक असून ते तब्बल ८ वेळा भाजपाच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत.

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी मात्र हे वृत्त फेटाळले आहे. भाजपा कुठल्याही विद्यमान काँग्रेस आमदाराच्या संपर्कात नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर काँग्रेसनेही उमेश यांचा हे विधान केवळ संभ्रम पसरवण्यासाठी असल्याचे म्हटले आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x