नवी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरून एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आणि ते भाजपच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचे दिसले. त्या व्यंगचित्रात स्वतः मोदी हेच मोदी यांना प्रश्न विचारत असल्याची मार्मिक टिप्पणी केली होती. त्यावर चवताळलेले भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी लगेच ट्विट करत, ‘राज ठाकेर यांना ही मुलाखत समजणं अवघड असून त्यांनी चला हवा येऊ द्या, हा कार्यक्रम बघावा’, असा खोचक टोला लगावला होता.
शेलार यांनी ट्विट करताना म्हटलं होतं की, ‘लोकांच्या प्रश्नांपेक्षा “मी” पणा जोपासण्यात जे धन्यता मानतात, त्यांना प्रथम राष्ट्र! मग पक्ष !आणि शेवटी मी !!अशी जीवननिष्ठा असलेल्यांच्या मुलाखती समजण थोड अवघडच असणार! वेळ असल्यामुळे कार्टून काढत..चला हवा येऊ द्या..बघायला हरकत नाही! आमच्या शुभेच्छा!!,` असे त्यांनी यात म्हटले आहे.
दरम्यान, कालच सरसंघचालकांनी सुद्धा नागपूरमधील एका कार्यक्रमात मोदींच्या मुलाखतीवरून अप्रत्यक्ष भाष्य आणि सूचक इशारा दिला होता. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मोहन भागवतांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकांबद्दल म्हटलं की ‘आम्हाला २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबद्दल शंका आहे’. मोदींनी राम मंदिरापासून सर्वच विषयावर केवळ वेळ मारणारी उत्तर दिली होती, जी अनेकांना पटली नव्हती. त्यामुळे सरसंघचालकांनी सुद्धा थेट नाराजी व्यक्त करत, असंच असेल तर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबद्दल आम्हाला शंका आहे, असा अप्रत्यक्ष सूचक इशारा दिला होता.
दरम्यान, मोहन भागवतांच्या त्याच वक्तव्याचा आणि मोदींच्या मुलाखतीचा संदर्भ देत, मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांना टोला लगावला आहे.
काय म्हटलं आहे गजानन काळे यांनी ट्विट करत?
अहाे शेलाार मामा या बदल पण बोला की राव.
याना पण चला हवा येवू दया बगायचा सल्ला देनार का?.. अहाे याना पण प्रथम राष्ट्र valya चौकीदार चीं मूलाखत समजली नाहीं असे बोलायचे का अाता.. सरसंघचालकाना शंका आहे तुमच्या सरकार badal आणि aamala शाहाणपणा शिकवता आहात..#dhongiModi pic.twitter.com/0rjKYT9rS4— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) January 3, 2019
