25 April 2024 4:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

आदर्श ग्राम योजनेत सत्ताधाऱ्यांच्या खासदारांनाच रस नसल्याचं उघड

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी अशा ‘आदर्श ग्राम योजनेत’ भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांसहित लोकसभा आणि राज्यसभेतील तिसऱ्या टप्यात ७८ टक्के खासदारांनी या योजनेकडे अक्षरशः पाठ फिरवल्याच एका आकडेवारीतून समोर आलं आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची अनास्था समोर आली आहे. तब्बल ७८ टक्के खासदारांनी अजूनपर्यंत गाव देखील दत्तक घेतलेलं नाही.

त्या अनास्थेत केवळ लोकसभा आणि राज्यसभेतील खासदाराच नाही तर मोदींच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री सुद्धा असून त्यात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, अरुण जेटली, सदानंद गौडा, अनंत गीते, रविशंकर प्रसाद, अनंत कुमार, स्मृती इराणी, थावरचंद गेहलोत, धर्मेंद्र प्रधान आणि चौधरी बिरेंद्र सिंह यांच्यासह तब्बल 23 मंत्र्यांचा समावेश आहे.

त्यामुळे मोदींच्या या महत्वाकांक्षी योजनेत मंत्र्यांसहित खासदारांना सुद्धा रस नसल्याचे आकडेवारीत समोर आलं आहे. या योजनेअंतर्गत लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांनी एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करायचा असं अपेक्षित होत. परंतु खासदारांना गाव दत्तक घेण्यात रस नसल्याचे समोर आलं. विशेष म्हणजे जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने केंद्रातील मोदी सरकारने जो अहवाल जाहीर केला त्यातच ही पोलखोल झाली आहे.

सुरुवातीला थोडा रस दाखवला खरा, परंतु पुढच्या टप्यात हळूहळू अनास्था समोर येऊ लागल्याचे या अहवालात समजते. या योजनेच्या तिसऱ्या टप्यात खरा बोजबारा उडाल्याचे समजते. कारण लोकसभेतील आणि राज्यसभेतील एकूण ७८६ खासदारां पैकी ७०३ खासदारांनी गाव दत्तक घेतलं होत. तर दुसऱ्या टप्यात हा आकडा घसरून ४६६ वर आला आणि तिसऱ्या टप्यात तर हा आकडा इतका खाली आला की तब्बल ७८ टक्के खासदारांनी या योजनेकडे पूर्ण पाठ फिरवली.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x