नेपीयर : ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट आणि वनडेमध्ये चमकदार कामगिरी करून दाखविल्यानंतर आता विराट कोहलीचा भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये सुद्धा फॉर्मात असल्याचे दिसते. कारण आजपासून ५ वनडे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध विजय संपादन करण्यासाठी विराट टीम सज्ज झाली आहे.
सकाळी न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. परंतु, मोहम्मद शमी आणि चहलच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचा संपूर्ण संघ गडगडला असून भारतासमोर केवळ १५७ धावांच लक्ष देण्यात आलं आहे. ३८ षटकांत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचे सर्व गडी तंबूत परतवले. त्यात गोलंदाजी करताना कुलदीप यादवने ४, मोहम्मद शमी ३, केदार जाधव १, चहलने २ असे गडी तंबूत धाडले आणि भारताचा विजय सुकर केला आहे.
