उष्मघातामुळे मृत्यू झालेल्या निष्पाप श्रीसदस्यांचा शिंदे समर्थक आमदाराकडून अपमान, म्हणाले 'दरवर्षी उष्माघाताने लोक मरतात'
MLA Sanjay Gaikawad | दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला लाखोंच्या संख्येनं श्री सदस्यांनी हजेरी लावली होती. मात्र या सोहळ्याला गालबोट लागलं. सोहळ्याला उपस्थित असलेल्या काही श्रीसदस्यांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. यावरून राज्य सरकारवर सर्वच बाजूने टीका सुरु आहे. उष्मघातामुळे नाही तर चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप देखील काही व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर करण्यात येत आहे.
11 महिन्यांपूर्वी