29 March 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

कल्पनारम्य धाडस दाखवून देश कधीही प्रगतीपथावर जाऊ शकत नाही: प्रणव मुखर्जी

Pranab Mukherjee, Narendra Modi

नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे कार्पोरेट क्षेत्रातील एका पुरस्कार सोहळ्यातच मुखर्जी यांनी नाव न घेता मोदींना लक्ष्य केलं. देशातील लोकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करेल आणि सोडवू शकेल, अशाच नेत्याची देशाला गरज आहे. केवळ कल्पनारम्य धाडस दाखवून देश कधीही प्रगतीपथावर जाऊ शकत नाही, असे म्हणत नोटाबंदीच्या निर्णयावरुन मुखर्जींनी मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

नवी दिल्लीतील कार्पोरेट एआयएमए मॅनेजिंग अवॉर्ड सोहळ्यात मुखर्जी उपस्थितांना संबोधित करत होते, त्यावेळी त्यांनी विधान केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, देश गेल्या कित्येक वर्षांपासून दारिद्र्याची लढाई लढतो आहे. त्यासाठी कार्पोरेट क्षेत्राने पुढे आले पाहिजे, देशातील १ टक्के लोकांकडे देशातील 60 टक्के पैसा असून ही चिंताजनक बाब आहे. आयएमएफच्या आकडेवाडीनुसार भारत हा जगातील ७व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. देशाची अर्थव्यवस्था ही युएसडी २.६९ ट्रिलियन्स एवढी आहे. सध्या मार्च २०१९ चा भारताचा विकासदर ७.४ असून पुढील वर्षी म्हणजे २०१९-२० मध्ये हा विकासदर (जीडीपी) ७.६ टक्क्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असल्याचेही मुखर्जी यांनी

देशातील कार्पोरेट वर्गाने पुढे येऊन देशातील बेरोजगारी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. वैयक्तिक नव्हे, तर रोजगार निर्मित्ती, सामाजिक उपक्रम आणि देशाच्या अर्थिक विकासाची धोरणं राबविली पाहिजेत. त्यासोबतच आरोग्य क्षेत्राकडेही लक्ष देणं गरजेचं असल्याचे मुखर्जी यांनी या परिषदेत बोलताना म्हटले आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x