6 May 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट
x

२०१४ मध्ये सत्तेत येण्याची खात्री नव्हती, म्हणून आश्वासनं देत सुटलो: नितीन गडकरी

मुंबई : आम्हाला २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत सत्तेत येण्याची खात्री नसल्याने काही जणांनी मतदाराला आश्वासने द्यायला सांगितली. त्यानंतर आम्ही इतकी आश्वासने दिली लोकांना की ती आता आठवत सुद्धा नाहीत अशी कबुली खुद्द केंद्रीय दळणवळन मंत्री नितीन गडकरी यांनी मकरंद अनासपुरे यांच्या ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमा दरम्यान दिली. परंतु, त्यांच्या या विधानाने भाजपच्या अडचणी वाढणार असून गडकरींच्या या कबुलीने भाजपची एक प्रकारे पोलखोल झाली आहे.

आम्ही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करत असताना सत्तेत येऊ असे अजिबात वाटले नव्हते. दरम्यान, काही जणांनी आश्वासने द्यायच्या सूचना केल्या आणि आम्ही आश्वासन देत सुटलो असं गडकरी म्हणाले. तसेच राजकारणात शरद पवार काय बोलतील आणि काय करतील यावर माझा विश्वास नाही. शरद पवार कोणाला सुद्धा समजणार नाहीत, अशी गमतीदार कबुली त्यांनी पवारांच्या राजकारणावर बोलताना दिली. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यावर बोलताना गडकरी म्हणाले की, आठवलेंना कुठे काय बोलावे आणि कविता कधी म्हणावी ते समजत नाही. ते मुद्दाम करत नाहीत. पण त्यांच्याकडून अशा चुका होतात असं मत त्यांनी रामदास आठवलेंबद्दल बोलताना व्यक्त केलं.

नितीन गडकरींसोबत अभिनेते नाना पाटेकर सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरींनी म्हणाले की, पवारांना राजकारणात कोणीही ओळखू शकत नाही. पवार यांना कृषी, ग्रामीण, शैक्षणिक, पक्ष संघटन आणि सामाजिकसह सर्वच बाबींचे ज्ञान आहे. ही शरद पवार यांची जमेची बाजू असल्याचे सुद्धा गडकरी आवर्जून म्हणाले. परंतु, त्याच शरद पवार यांची खटकणारी बाब कोणती असे विचारले असता ते म्हणाले की, ते राजकारणात काय बोलतात आणि काय करतात हे कधीच कळत नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x