
UPI Payment Limit | आधी कोणताही व्यवहार करताना, वस्तू खरेदी करताना सुट्टे पैसे नेहमीच मोठी अडचण ठरत होते. मात्र आता यूपीआय पीन आल्याने ही अडचन कायमची मिटली आहे. आजकाल स्वत: जवळ पाकिट ठेवण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आधुनिक युगात वावरताना अनेक व्यक्ती कॅशलेस व्यवहार करण्यास जास्त पसंती दाखवतात. यामुळे व्यवहार करणे सहज सोपे झाले आहे.
कोणत्याही ठिकाणी घरबसल्या पैसे पाठवायचे असल्यास अनेक व्यक्ती यूपीआयचा वापर करतात. मात्र दिवसातून आपण यूपीआय पीन किती वेळा वापरू शकतो? एका वेळी किती पैसे ट्रांसफर करू शकतो? असे प्रश्न आजही अनेकांना पडले आहेत. तर या बातमीतून तुम्हाला पडलेल्या याच प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेणार आहोत.
बॅंक अकाउंटच्या यूपीआय पीनमधून सध्या दिवसाला जवळपास २० कोटींपेक्षा जास्त व्यवहार केले जातात. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने बॅंकांना त्यांच्या क्षमतेनुसार यूपीआयच्या मर्यादा दिल्या आहेत. बॅंकेतून संबंधीत व्यक्ती एका दिवसाला किती रक्कम ट्रांसफर करू शकतो. तसेच दिवसातून किती वेळा यूपीआय पीन वापरू शकतो यासाठी प्रत्येत बॅंकेला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे.
भीम यूपीआयची मर्यादा तब्बल १ लाख रुपये
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या वेबसाइटवर दिलेल्या माहिती नुसार बॅंक खात्यातून एका दिवसासाठी १लाख रुपये ट्रांसफर करण्याची मर्यादा आहे. भीम यूपीआय मार्फत पैसे पाठवायचे असतील तर त्यासाठी देखील १ लाख रुपयांची मर्यादा आहे. तसेच या वेबसाइटवर यूपीआय मार्फत जास्तीत जास्त २ लाख रुपये पाठवले जाउ शकतात असे देखील सांगण्यात आले आहे.
1 दिवसात यूपीआयचा वापर किती वेळा कराल
एका दिवसात यूपीआयचा वापर हा जास्तीत जास्त १० वेळा केला जाऊ शकतो. मात्र त्याची मर्यादा १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. हा नियम एचडीएफसी बॅंकेचा आहे. ही बॅंक आपल्या खातेधारकांना दिवसातून १० वेळा यूपीआय वापरण्याची परवानगी देते. तसेच प्रत्येक बॅंकांचे एका दिवसासाठी यूपीआय वापरण्याचे नियम वेगवेगळे आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.