
Post Office Scheme | सध्याच्या धावपळीच्या जिवणात प्रत्येक व्यक्ती स्वत:साठी सुरक्षित मार्गाच्या शोधात आहे. आपण आणि आपले कुटूंब सध्या जरी आर्थिक विवंचनेत नसले तरी कालंतराने भविष्यात कोणते संकट येणार आहे याची कुणाला जाणिव नसते. त्यामुळे याच काळात संरक्षणासाठी अनेक जण वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करतात. त्यातील पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूका सर्वात उत्तम माणल्या जातात.
नुकतीच पोस्टाने टाइम डिपॉझिट ही योजना आणली आहे. ही योजना तुमच्या बॅंकेतील एफडी प्रमाणे काम करते. या योजनेत शासनाने नुकतीच व्याजाच्या दरात वाढ केली आहे. ही वाढ ३० आधार अंकांनी केलेली आहे. म्हणजेच यात गुंतवणूक करणा-या व्यक्तीला ६.७ टक्के या दराने व्याज मिळणार आहे. या योजनेची खासियत अशी आहे की, ही एफडी प्रमाणे असून तुम्ही छोट्या किंवा मोठ्या कालावधीसाठी यात गुंतवणूक करू शकता. यात १ वर्षापासून ते ५ वर्षामर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.
योजनेसाठी कोण आहे पात्र
पोस्टाच्या टाइम डिपॉझिट योजनेत भारतातील कोणताही नागरीक खाते उघडू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो. इतकेच नाही तर गुंतवणूकीसाठी संयुक्त खात्याची देखील सोय आहे. यात एकाच वेळी तीन व्यक्ती यात खाते खोलू शकतात. तुमच्या १० वर्षांपेक्षा मोठ्या मुलाच्या नावे देखील या योजनेत तुम्ही पैसे गुंतवू शकता. यात अगदी १००० रुपयांच्या गुंतवणूकीपासून तुम्हाला बचतीसाठी सुरूवात करता येते.
६.७ टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज
या योजनेत वेगवेगळ्यासेच कालावधी नुसार व्याजाचे दर आकारण्यात आले आहेत. जर पाच वर्षांसाठी तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर ६.७ टक्के या दराने व्याज मिळेल. तीन वर्षांसाठी ५.८ आणि दोन वर्षांसाठी ५.७ तर एका वर्षासाठी या योजनेत ५.५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. व्याजाची हे दर त्या त्या कालावधीनुसार निश्चित करण्यात आले आहेत.
टॅक्स भरण्यापासून होईल सुटका
यात जर तुम्ही पाच वर्षांसाठी गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला टॅक्स पासून सुटका मिळेल. कोणतेही इनकम टॅक्स तुम्हाला भरण्याची गरज पडणार नाही. कलम १९६१ च्या सेक्शन ८० क नुसार हा फायदा होईल. तसेच मॅच्युरीटी पुर्ण होण्याआधी तुम्हाला पैसे हवे असतील तर त्यावर दंड आकारण्यात येईल. यासह टॅक्सची पासून मिळणारी सुटका फक्त पाच वर्षांच्या योजनेसाठीच आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.