
Penny Stocks | जर तुम्हाला अल्प गुंतवणूक करून जास्त पैसा कमवायचा असेल तर, शेअर बाजारात गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय असू शकतो. शेअर बाजारात अनेक लहान मोठ्या कंपन्या आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांच्या अल्प गुंतवणुकीचे रूपांतर करोडो रुपयांमध्ये केले आहे. आज या लेखात आपण अशाच एका कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत, जिने लोकांचे आयुष्य बदलून टाकले आहे. या कंपनीचे नाव आहे,”भारत बिजली”. ही कंपनी ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रिक मोटर्स, लिफ्टसाठी गियरलेस मशीन यांसारखी मशीनचे उत्पादन करते. या कंपनीच्या शेअरने लोकांना करोडपती कसे केले, आणि पुढील गुंतवणूक धोरण काय असावे, जाणून घेऊ.
भारत बिजली कंपनीच्या शेअरची किंमत :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार शेवटच्या काही तासात बंद होताना NSE वर भारत बिजली कंपनीचा शेअर 2408.55 रुपयांवर बंद झाला. त्या दिवशी, शेअरमध्ये 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली होती, म्हणजेच स्टॉक सुमारे 98 रुपयांच्या वाढीसह ट्रेड करत होता. NSE निर्देशांकावर या कंपनीच्या स्टॉकची एका वर्षातील नीचांक पातळी किंमत 1,320.00 रुपये होती. त्याच वेळी, या कंपनीच्या शेअरची एक वर्षातील उच्चांक पातळी किंमत 2,439.95 रुपये आहे. या कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल 1,361 कोटी रुपये आहे.
अल्पशा गुंतवणुकीचे झाले एक कोटी :
19 ऑक्टोबर 2001 रोजी भारत बिजली कंपनीचा शेअर 5.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.आता या शेअरची किंमत 2,439.95 रुपयांपर्यंत वाढली आहे. 2001 साली जेर तुम्ही या स्टॉकमध्ये 25000 रुपये लावले असते, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते.
वीज क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत :
भारतातली पॉवर सेक्टरबाबत गुंतवणूक तज्ज्ञांचे मत खूप सकारात्मक आहे. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते भारताचा GDP जसजसा वाढत जाईल, तसतसा देशातील विजेचा वापर आणि मागणी वाढत राहील. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणि नवीकरणीय ऊर्जेवर वाढते लक्ष यामुळे ऊर्जा क्षेत्रात पुढील येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढणार आहे. या गुंतवणुकीचे फायदा भारत बीजली कंपनीला नक्की मिळणार.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.