
Unemployment Hike | ऑक्टोबर महिन्यात भारतात बेरोजगारी वाढली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी लिमिटेडने हा दावा केला आहे. यानुसार ग्रामीण भागातील वाढत्या बेरोजगारीमुळे ऑक्टोबरमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर दोन वर्षांहून अधिक काळातील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
किती बेरोजगारी :
बेरोजगारीचा दर सप्टेंबरमधील ७.०९ टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये १०.०५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो मे २०२१ नंतरचा उच्चांक आहे. या काळात ग्रामीण बेरोजगारी ६.२ टक्क्यांवरून १०.८२ टक्क्यांवर गेली, तर शहरी बेरोजगारी किंचित कमी म्हणजे ८.४४ टक्के झाली.
वाढत्या ग्रामीण बेरोजगारीची कारणे :
तांदूळ, गहू आणि साखर उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असलेल्या भारतात गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम कृषी उत्पादनावर होत आहे. तथापि, शहरी भागात उत्पादन आणि वापराच्या विस्तारासह आर्थिक क्रियाकलाप तुलनेने मजबूत आहेत. नुकत्याच झालेल्या एका सरकारी सर्वेक्षणानुसार जुलै २०२२ ते जून २०२३ या कालावधीत १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील बेरोजगारीचा दर ३.२ टक्के होता. हा सहा वर्षांतील नीचांकी स्तर आहे.
अर्थव्यवस्थेचा वेग :
भारताची अर्थव्यवस्था या वर्षी ६ टक्क्यांहून अधिक दराने वाढेल आणि पुढेही वेगाने वाढेल, असा डंका मोदी सरकार पिटतय, मात्र लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याइतपत ते अजूनही वेगवान झालेले नाही. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये सुमारे एक कोटी लोकांनी काही तरी काम मिळेल या आशेने जॉब मार्केटमध्ये प्रवेश केला. मात्र या सरकारी वेबसाईट्स लोकांचा डेटा गोळा करण्यासाठीच आहे अशी टीका होऊ लागली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.