
Property Rights | आपल्या भारत देशात मालमत्तेचे विभाजन करून देण्यासाठी कायदा स्थापन केला आहे. ज्यामध्ये 1965 साली हिंदू उत्तराधिकारी कायदा मंजूर करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत हिंदू, जैन, शिख आणि बौद्ध या समाजातील व्यक्तींना मालमत्ता विभाजनासाठी तुम्हाला उत्तराधिकार कायद्याअंतर्गत विभाजन निश्चित करावे लागेल. परंतु अजूनही एक प्रश्न कायम असतो तो म्हणजे मुलींना वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क असतो का.
2005 साली हिंदू वारसा हक्क कायद्यात सुधारणा करण्यात आली होती. सुधारणा झाल्यानंतर मुलांप्रमाणे मुली देखील त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर समान हक्क सांगू शकतात. परंतु लग्न झाल्यानंतर मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार मिळतो का, लग्न झाल्यानंतर किती हक्क बजावता येतो या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या बातमीपत्रातून जाणून घेणार आहोत.
लग्न झाल्यानंतर देखील मुलींना मालमत्तेवर समान हक्क :
2005 आधी हिंदू वारसाहक्क कायद्याअंतर्गत लग्न व्हायच्या आधी मुलींना वडिलांच्या मालकीवर हक्क असायचा. परंतु 2005 नंतर हिंदू वारसाहक्क कायद्यामध्ये पूर्णतः बदल केले. बदल केल्यानंतर मुलींना लग्न झाल्यानंतर देखील वडिलोपार्जित संपत्तीवर तितकाच हक्क असणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे काही व्यक्तींना असेही प्रश्न पडलेले असतात की, लग्नानंतर मुलीच्या वारसा हक्काचा कालावधी किती असतो. तर, या कायद्याअंतर्गत कोणत्याही प्रकारचा कालावधी निश्चित केला नाहीये.
मुलींना केवळ वडिलांच्या संपत्तीवर हक्क दाखवता येणार :
मालकी हक्काचे दोन प्रकारे वर्गीकरण केले आहे. ज्यामध्ये वडिलोपार्जित आणि स्वअर्जित अशा प्रकारचे दोन प्रकार पाहायला मिळतात. वडिलोपार्जित संपत्ती सर्वांनाच माहित आहे. वडिलोपार्जित म्हणजे पिढ्यानपिढ्या वडिलांच्या ही वडिलांपासून स्थायिक असलेली संपत्ती. अशा संपत्तीवर मुलगा आणि मुलगी दोघांचाही समान हक्क असतो. त्याचबरोबर मुलीच्या लग्नानंतर देखील तिला वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क दर्शवता येतो.
स्वअर्जित संपत्ती ही वडिलांनी स्वतःसाठी कमावून ठेवलेली असते. ज्यावर लग्न झालेल्या मुली हक्क सांगू शकत नाहीत. परंतु वडील स्वतःहून स्वतःच्या इच्छेनुसार इच्छापत्रातील स्वअर्जित संपत्ती मुलीला देखील मिळावी असे लिहीत असेल तर, दोघांनाही समान संपत्ती विभाजन केले जाते. तर अशाप्रकारे लग्न झालेल्या मुलींना वडिलांच्या मालमत्तेत स्वतःचा हक्क सांगता येतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.