7 May 2025 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

इंदूर कसोटी: भारताचा बांगलादेशवर डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय

Indian Cricket team, Bangladesh Cricket team, Cricket test match

इंदूर: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने (Indian Cricket Team) पहिल्या डावात ३४३ धावांची विजयी अशी आघाडी घेतली होती. या डोंगरा ऐवढ्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा (Bangladesh Cricket Team) दुसरा डाव २१३ धावात संपुष्ठात आला. तिसऱ्या दिवशी सकाळी भारताने पहिला डाव घोषित केला. त्यानंतर ३४३ धावांचा डोंगर घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव देखील कोसळला. पहिल्या डावा प्रमाणे दुसऱ्या डावात देखील मुस्ताफिझूर रेहमान (६४) वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. या विजयासह भारताने कसोटीमध्ये घरच्या मैदानावर सलग १३व्या विजयाची नोंद केली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

त्याआधी दुसऱ्या दिवशी मयांक अग्रवालचे अडीचशतक अवघ्या काही धावांनी हुकले. १ बाद ८६ या धावसंख्येवरून आज भारताने डावाला सुरूवात केली होती. त्यानंतर मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांच्या दमदार खेळीच्या बळावर भारताने ४९३ धावा केल्या आणि दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार विराटने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशपुढे ३४३ धावांचे आव्हान ठेवले.

रोहित शर्माने (Hitman Rohit Sharma) १७व्या षटकात रहीमला जीवदान दिले होते. त्यावेळी रहीम (Rahim) हा फक्त चार धावांवर होता. मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) गोलंदाजीवर रोहितने रहीमचा सोपा झेल सोडला होता. त्यावेळी रोहित दुसऱ्या स्लीपमध्ये होता. या जीवदानाचचा पुरेपूर फायद रहीमने उचलल्याचे पाहायला मिळाले. या जीवदानानंतर रहीम स्थिरस्थावर झाला आणि त्याने त्यानंतर संयमी फलंदाजी केली. दोन अंकी धावसंख्या उभारत रहीमने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आता रहीमने आपल्या नावावर केला आहे.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या